कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा उद्बोधन वर्ग

कस्तुरबा गांधी विद्यालयामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा उद्बोधन वर्ग

सेलू :  शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये माता रमाई जयंतीचे औचित्य साधून इयत्ता आठवीच्या  शिष्यवृत्ती परीक्षेसाठी  उद्बोधन वर्गाचे आयोजन केले गेले. यावेळी व्यासपीठावर मुख्याध्यापिका सुनीता वेडे, गृहप्रमुख प्रेरणा पवार,विभागप्रमुख योजना कातकडे यांची, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कीर्ती राऊत यांची उपस्थिती होती. यावेळी कीर्ती राऊत यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व, परीक्षेच्या पूर्वसंध्येला घ्यावयाची काळजी याबरोबरच चांगल्या सवयी अंगी जोपासण्याचे आवाहन बालिकांना केले. पुढे बोलताना कीर्ती राऊत म्हणाल्या की, जीवनात सातत्य चिकाटी आणि जिद्द कायम ठेवा यश नक्कीच मिळेल. अभ्यास केलेला कधीही वाया जात नाही. आहाराकडे लक्ष द्या व येणाऱ्या स्पर्धा परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा.यश तुमच्या हातात आहे. प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुनिता वेडे यांनी केले. स्वागत गीत सपना बाळू जाधव हीने गायले. सूत्रसंचालन कलाशिक्षक पांडुरंग पाटणकर यांनी तर उपस्थितांचे आभार अश्विनी बोराडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुहास नवले, रावसाहेब पदमपल्ले, वनदेवी वाघमारे, बेबी केंद्रे, सुजाता सेलुकर,अनुसया शिंदे, आम्रपाली कांबळे, शितल अवचार यांनी परिश्रम घेतले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!