परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी हक्क मोर्चा

परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार शेतकरी हक्क मोर्चा

विविध मागण्यांसाठी मंगळवारी परभणीत प्रचंड मोर्चा

परभणी : जिल्ह्यातील 52 महसूल मंडळातील लाखो शेतकऱ्यांचे खरीप 2024 सोयाबीन तूर, कापूस आदी पिकांचा आग्रीम, वैयक्तिक तक्रारी व इतर 500 कोटी रुपयाचा पिक विमा आयसीसीआय लोम्बार्ड कंपनीकडे थकीत आहे. पाठपुरावा करून सुद्धा पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना दाद देत नाही. परभणी जिल्हा प्रशासन सुद्धा याबाबत उदासीन आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा पिक विमा वसूल करण्यासाठी. परभणी जिल्ह्यातील पिक विमा चळवळीच्या शेतकरी कार्यकर्त्यांनी शेतकरी हक्क मोर्चाचे आवाहन केले आहे. सेलू तालुक्यासह जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंगळवारी, 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.00 वाजता परभणी मोंढा मार्केट कमिटी पासून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी होणार आहेत. मोर्चाच्या तयारीसाठी चळवळीतील कार्यकर्ते गावोगावी शेतकऱ्यांना भेटी देऊन मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करत आहेत. शेतकऱ्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिसत आहे. गावोगावचे शेकडो शेतकरी स्वखर्चाने मोर्चात सहभागी होण्यासाठी उत्सुक आहेत. कारण हा मोर्चा कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनेच्या नावाने निघत नाही, कोणत्याही व्यक्तीने नाही. शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काढलेला हा शेतकरी हक्क मोर्चा आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.सुभाष कदम, हेमचंद्र शिंदे, विश्वंभर गोरवे, गोविंद लांडगे

 

♠ शेतकरी हक्क मोर्चाच्या प्रमुख मागण्या 

◆ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम 2024 मधील थकीत 25% अग्रीम पिक विमा, स्थानिक आपत्तीतील नुकसान भरपाई, काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान भरपाई मिळावी.

◆ परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये उत्पादित केलेले सर्व सोयाबीन MSP नुसार खरेदी करण्यात यावे

◆ शेतकऱ्यांचा पिक विमा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्ड पिक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करून काळ्या यादीत टाकण्यात यावे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!