कबड्डी स्पर्धेत जि.प.शाळांच्या खेळाडूंनी गाजवली मैदाने
मानस, प्रिन्स, नूतन, नखाते , क्रांतीसिंह, कस्तूरबा शाळेचे वर्चस्व
सेलूतून कबड्डीचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू घडतील- प्रा.डॉ. माधव शेजूळ
८० संघ व ९५० खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग
सेलू : सेलू शहर व तालुक्याला दर्जेदार व गुणवत्तापूर्ण क्रीडा व शैक्षणिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे, त्यामुळे भविष्यात सेलू तालुक्यातून कबड्डीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निश्चित घडतील, असा विश्वास महाराष्ट्र राज्य अथेलॅटीक्स संघटनेचे खजीनदार तथा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.डॉ.माधव शेजूळ यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ व्या जन्मोत्सवा निमित्त नूतन विद्यालयाच्या मैदानावर मंगळवारी, १८ फेब्रुवारी रोजी आयोजित आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ शिवाजी मगर, प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रणजित काकडे, माजी नगराध्यक्ष विनोदराव बोराडे, सपोनि माधव लोकूलवार, मिलींद सावंत, मुख्याध्यापक सर्जेराव लहाने , संतोष पाटील, दिलीप सुरवसे, डॉ.अनिकेत जोगदंड, डॉ.बोराडे, डॉ शिंदे, डी.डी.सोन्नेकर, गणेश माळवे , प्रशांत नाईक, रामराव बोबडे, रामराव गायकवाड, समितीचे अध्यक्ष गोविंद काष्टे , उपाध्यक्ष दतात्रय सोळंके, सचिव रामेश्वर शेरे आदींची उपस्थिती होती.
या आंतर शालेय कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील मुला – मुलींचे एकूण ८० संघ व ९५० खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेवर ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवून आपल्या बहारदार खेळाने मैदाने गाजवली. स्पर्धेत मुलांच्या माध्यमिक गटात मानस स्पोर्टस अकॅडमी – प्रथम, कांतीसिंह नानापाटील विद्यालय- व्दितीय, तर जि.प. प्रशाला देऊळगाव गात- तृतीय , मुलींच्या माध्यमिक गटात प्रिन्स इंग्लिश स्कूल – प्रथम, जि .प. प्रशाला देऊळगाव गात- व्दितीय, के.जी.बी.व्ही.शाळेने – तृतीय तर प्राथमिक मुलांच्या गटात मानस स्पोर्टस- प्रथम, नूतन विद्यालय – व्दितीय तर जि.प. हादगाव तृतीय तर मुलींच्या गटात प्रिन्स इंग्लिश स्कूल- प्रथम, शांताबाई नखाते विद्यालय- व्दितीय,जि.प.देऊळगाव गात – तृतीय क्रमांक पटकावला.
प्रास्ताविक मुख्याध्यापक सर्जेराव लहाने, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर बजरंग आरकुले यांनी आभार मानले. पंच म्हणून संजय भूमकर, राजेभाऊ चव्हाण, राजेश राठोड, अनुराग आमटी , राहूल घांडगे , प्रभू शिंदे , सुनील गायकवाड ,महादेव खरात , शरद मगर,रामेश्वर मगर, राजू दयावरवार, राजेंद्र होलसुरे ,विकास कदम, पांडूरंग लाडणे , विष्णु आंधळे, गंगाधर आवचार , तानाजी भोसले, हारकळ, आदींनी परिश्रम घेतले.