विद्यार्थ्यांनो, जो जागतो त्यालाच जागा मिळते
प्रसिद्ध लेखक भारत सातपुते यांचे प्रतिपादन, पारडीच्या शाळेतील कल्याणी आडे, ईश्वरी राठोड विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान
सातपुते यांच्याकडून शाळेला ५१ हजार रुपयांच्या पुस्तकांची भेट
सेलू : तालुक्यातील विविध प्रयोगशील उपक्रमांनी नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडीच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला.यामधे शाळेतील विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. वर्ग साहवीत शिकणारी कल्याणी आडे यावर्षीच्या एकलव्य पुरस्काराची मानकरी ठरली तर यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट विद्यार्थीनीचा मान ईश्वरी राठोड हिला मिळाला. प्रयास माने व कोमल आडे, प्रतीक राठोड, आरती राठोड, दिव्या आडे, अभिषेक आडे आदी विद्यार्थ्यांना शाळारत्न पुरस्काराने सन्मानित केले.
यावेळी सुप्रसिद्ध लेखक भारत सातपुते यांनी,”विद्यार्थ्यांनो सतत जागं रहा, जो जागतो त्यालाच जागा मिळते, प्रचंड मेहनत घ्या यश मिळतेच” असे आवाहन केले. त्यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून केलेल्या अनेक प्रयोगांची माहिती यावेळी दिली. त्याचप्रमाणे शाळेला ५१००० रुपयांच्या पुस्तकांची भेट देण्याची घोषणा त्यांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत केली.
विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह, ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल राठोड शा. व्य.समिती अध्यक्ष पारडी, मुख्य अतिथी म्हणून नीलाताई आडे,सरपंच पारडी,मा. नितीन लोहट,सुप्रसिद्ध लेखक भारत सातपुते , प्रसिद्ध कवी आत्माराम कुटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून, साहेबराव राठोड, पोलीस पाटील, विठ्ल राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष पारडी, माऊली राठोड , माजी सरपंच, डी के कुलकर्णी मुख्याध्यापक पारडी, विकास आडे, गजानन आडे, अमोल आडे, शिवाजी लंघे, अनिल राठोड, मधुकर पवार, भारत चव्हाण प्रा. श्रेयस पवार, अमोल राठोड, योगेश डवारे, शाम मचाले, रामप्रसाद राठोड, कुमार लंघे, गंगाधर वानोळे, विलास मेंडके आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूनम राठोड व प्रयास माने या विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रदर्शन गणेश आकलोड यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाम रूपनर, संजय काकडे, कमलबाई चव्हाण, शिलाताई लंघे, युवराज माने यांनी सहकार्य केले.