सेलू महावितरणचा उंटावरून कारभार

सेलू महावितरणचा उंटावरून कारभार

कुजलेले पोल व लोंबकळलेल्या तारा…; सोलार बील देण्यातही टाळाटाळ

सेलू अखिल भारतीय ग्राहक पंचायती तक्रार

सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : शहरातील हेमंत नगर, फुले नगर, मौलाना आझाद नगर, विष्णुनगर, छत्रपती शिवाजी नगर, कृष्ण नगर, पुनर्वसन लगत, गायत्री नगर, राजगड काॅलनी, विद्यानगर अशा विविध भागात महावितरणचे जुने कुजलेले खांब असून बऱ्याच भागात लोंबकळलेल्या विजेच्या तारा आहेत. असे खांब व तारा तत्काळ बदलण्याची मागणी सेलू अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने महावितरण कार्यालयाकडे करण्यात आली आहे.

परिस्थिती जैसे थे

दुभाजक नसलेल्या तारा,खराब झालेले कीटकॅट, वाकलेले खांब असुन ज्या वेळी एखादा अपघात होतो, त्याच वेळी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी धावाधाव करतात अन तातपुरती डागडुजी करतात. अशीच एक घटना मागील ४ सप्टेंबर २०२४ रोजी घडली होती. लोंबकळलेल्या ताराचा ट्रक्टर ट्रालीचा स्पर्श होऊन फुलेनगर भागातील २५ वर्षीय युवकाचा अपघाती मृत्यु झाला होता. त्या भागात अद्यापपर्यंत लोंबकळलेल्या तांराची जशीच्या तशी परिस्थितीत आहे.

अधिकाऱ्यांचा उंटावरून कारभार

शहर कनिष्ठ अभियंता, ग्रामीण अभियंता व उपकार्यकारी अभियंता हे तिघेही अद्याप मुख्यालयी रहात नाहीत. शहर कनिष्ठ अभियंता परळीहून ये-जा करतात. ग्रामीण अभियंता नांदेड तर उपकार्यकारी अभियंता छत्रपती संभाजीनगर येथे राहतात. तर कार्यालयीन दोन तीन कर्मचारी परभणी शहरातून जाणे-येणे करतात. अर्थातच वेळेवर कोणीच हजर नसतात.घडीच्या काट्याकडे पाहून कार्यालयीन कामकाज चालते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यावर कोणाचाच अंकुश नसल्याचे चित्र दिसते.

सूर्यघर योजनेच्या अंदाजे बीलाचा भुर्दंड

सध्या पी.एम.सूर्यघर योजनेंतर्गत रूप टॉप सोलार बसवण्याकडे मोठ्या प्रमाणात ग्राहकांची ओढ आहे. सोलारचे वेंडर त्याचे काम पूर्ण करतात व आनलाईनचे तांत्रिक कामे हे कार्यालयाचे असते व ते झाल्याशिवाय सोलार ग्राहकांचे बिल हे सोलारमध्ये रूपांतरीत होत नाही. ते हेतुपुरस्सर केल्या जात नाही व सोलारचे ग्राहक कार्यालयात खेट्या घालतात. मग एजंटामार्फत कळते की साहेबांना चिरी मिरी द्यावी लागते. तो एजंट ती घेऊन ते रघडलेल काम पूर्ण करतो व चिरीमिरी न दिल्यास चार चार महिने नाहक त्या सोलार ग्राहकास अंदाजे बिलास सामोरे जावे लागते. अशी तक्रार अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सेलू शाखेच्या वतीने संबंधित अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या बाबतचा लेखी अहवाल खुलासा १५ दिवसात द्यावा अशी विनंती देखील अखिल भारतीय ग्राहक पंचायत सेलूच्या वतीने करण्यात आलेली आहे.

सेलू महावितरणचा उंटावरून कारभार

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!