सेलूच्या नूतन विद्यालयाचे ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र
स्पर्धा परीक्षेत ‘नूतन’ चा दबदबा कायम, २० विद्यार्थी झळकणार गुणवत्ता यादीत
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेद्धारा फेब्रुवारी २०२५ मध्ये आयोजित इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल शुक्रवारी, २५ एप्रिल रोजी जाहीर झाला आहे. सेलू येथील नूतन विद्यालयाचे पाचवीचे ५, तर आठवीचे २५ असे एकूण ३० विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरले आहेत. अंतिम निकालात २० विद्यार्थी शिष्यवृत्तीधारकांच्या परभणी जिल्हा गुणवत्तायादीत झळकणार आहेत. यामुळे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत नूतन विद्यालयाचा दबदबा याहीवर्षी कायम राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना विभाग प्रमुख सुनील तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली जादा वर्गाचे नियमित आयोजन करण्यात आले. त्यांना अरविंद आंबेकर, बाळू बुधवंत, प्रभू भुसारे यांनी सहाय्य केले, तर पाचवीच्या विद्यार्थ्यांना बन्सीधर पद्मावत, आरती कदम, वर्षा कदम, गजानन मुळी यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्यान, शाळेत शिष्यवृत्तीसाठी जादा वर्गातून मार्गदर्शन केले जाते. सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. यामुळे इयत्ता आठवीचा निकाल २६.५९ टक्के असून, तो परभणी जिल्ह्याच्या तुलनेत १५.७७ तर परीक्षा परिषदेच्या राज्यस्तरीय सरासरी निकालापेक्षा ७.२९ टक्क्यांनी अधिक आहे, असे श्री.तोडकर यांनी सांगितले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष सीताराम मंत्री, नंदकिशोर बाहेती, दत्तराव पावडे, मकरंद दिग्रसकर, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक एस.व्ही.पाटील, के.के.देशपांडे, आर.एस.मोगल आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले असून विविध स्तरांतून विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची नावे अशी :
इयत्ता आठवी : साईराज दौड (२६२), दत्तप्रसाद लव्हराळे, (२४८), मृणमयी इक्कर (२४२), शिवम वैद्य (२४०), पार्थ चौधरी (२४०), मैथिली मोरे (२३४), आरिजखान पठाण (२३०), अर्णव क्षीरसागर (२२६) सत्यम गुगाणे (२२२), आशिष ताठे (२२२), शाश्वत संघई (२१६), विनय बेले (२१६), श्रीनिवास पांडे (२१४), स्वराज पांडे (२१२), आरूष शेळके (२१०), अधिराज पंतगे (२०२), अभिजीत बोराडे (२००), अनुष्का चव्हाण (१७८), आविष्कार ताठे (१७६), रामेश्वर मुंढे (१६४), तेजस्वी सोलापुरे, (१५८), गौरी डोईफोडे (१५४), रूद्रांश हट्टेकर (१४२), नम्रता बोराडे (१३८), अंकिता खरात (१३२)
इयत्ता पाचवी : आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी (२६६), शिवराज कैलास आवटे (२२८), स्वराज विजय सोंजे (१९२), ओम विक्रांत उदावंत (१५०), गौरी संतोष पत्रे (१४८)