पीकविमाप्रश्नी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
सकाश न्यूज नेटवर्क, सेलू : खरीप पीकविमा २०२४ अद्याप पर्यंत मिळालेला नाही. तो तत्काळ द्यावा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांच्यावतीने देण्यात आला आहे. या संदर्भात सेलूच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, खरीप पीकविमा २०२४ अद्याप पर्यंत मिळालेला नाही. या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. तसेच एका दिवसात तब्बल २५० मीमी पाऊसाची नोंद झाली. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करुन त्याचे अनुदान सुद्धा दिले. परंतु आयसीआयसीआय लोम्बार्ड कंपनी विमा देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. अग्रीम व उर्वरित ७५% रक्कम न दिल्यास मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. या वेळी रामेश्वर गाडेकर, प्रकाश आंधळे, रामेश्वर शं.गाडेकर, दिलीप काकडे, बाबासाहेब गाडेकर, विठ्ठल गाडेकर, कल्याण गाडेकर, रघुनाथ टाके, तुकाराम उन्डे,