मुसळे यांच्या लेखनात ग्रामीण जीवनाचे चित्रण : प्रकाश भालेराव
स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात कार्यक्रम
सेलू : ग्रामीण भागातील शेतकरी कष्टकरी लोकांचे वास्तव जीवन चित्रण या कादंबरीतून केले गेले आहे. मी कादंबरी वाचत असताना मी त्या परिवारातील सदस्य असल्याची भावना निर्माण होत होती. एखाद्या शेतकऱ्यांचे कष्टप्रद जीवन आणि त्यांनी उराशी बाळगलेली स्वप्न कधीच पूर्णत्वास जात नाहीत हे वास्तववादी लेखन बाबाराव मुसळे यांनी केले आहे, असे प्रकाश भालेराव यांनी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे साहित्यिक स्व.देविदासराव कुलकर्णी यांच्या स्मृती निमित्त आयोजित एक दिवस एक पुस्तक या अठ्ठाविसाव्या पुष्पात प्रतिपादन केले. ‘हाल्या हाल्या दुधू दे’ ही १९८५ साली प्रकाशित कांदबरी आहे,परंतु आज ४० वर्ष झाली तरी शेतकरी कुटुंबांची अवस्था बदललेली नाही. खरंच भारत कृषीप्रधान देश आहे काय ? हा प्रश्न आजही आहे, उद्याही राहिल.हे मात्र तितकेच खरे आहे.असे अध्यक्षीय भाषणात प्रा.डाॅ.राजाराम झोडगे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी तर सूत्रसंचालन सुभाष मोहकरे आणि आभार प्रा.के.डी.वाघमारे यांनी केले.कार्यक्रमास श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.