कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सभा उत्साहात 

कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सभा उत्साहात 

राज्यभरातील कासार समाज बांधवांची मोठी उपस्थिती

कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळांची वार्षिक सभा उत्साहात 

छत्रपती संभाजीनगर : अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, २० जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील श्री कालिकादेवी मंदिर एन-९ सिडको येथे उत्साहात पार पडली.

समाजोपयोगी कामासाठी व समाजाच्या उन्नतीसाठी अखिल भारतीय सोमवंशी क्षत्रिय कासार समाजोन्नती मध्यवर्ती मंडळांची १०० वर्षांपूर्वी स्थापना झालेली आहे. संस्थेची ध्येय धोरणे समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचवणे आणि निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढवून विकास साधणे, या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर येथील उत्कर्ष मंडळ आणि कासार साथी मंडळाच्या सहकार्याने मध्यवर्ती मंडळांची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष पु.भा.अक्कर होते. व्यासपीठावर शामराव किवळेकर, मध्यवर्ती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शरदराव भांडेकर, रमेश अंधारे, शामशेठ कासार, नंद‌किशोर शिलवंत, डॉ.रमाकांत दगडे, मनीष चुटके, राजेंद्र तांबट, ॲड.लिना आडे, शिवराज आंदोले, सचिव प्रतिभा वेळापुरे, पद्‌मीनी मंडलेश्वर काळे, उज्जला कोळपकर, श्रद्धा घडामोडे, महेश कोकीळ, आर.डी.शिनगारे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविकात मागील वर्षीचा अहवाल व कार्यआढावा अरुण वेळापुरे यांनी सादर केला.

मध्यवर्ती मंडळाच्या माध्यमातून आजवरच्या सर्वच अध्यक्षांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिलेले आहे, असे अध्यक्ष श्री.भांडेकर यांनी मनोगतात नमूद केले. मात्र, मागील अनेक वर्षांपासून काही विघ्नसंतोषी मंडळी मंडळाच्या कार्यात तांत्रिक अडचण निर्माण करून समाजाच्या विकासाआड येत आहेत, असा आरोपदेखील त्यांनी केला. मागील सहा वर्षांपासून संघटन, संवाद आणि विकास या त्रिसूत्रीने राज्यभरातील कासार समाज जोडत असताना, बांधवांचे खूप प्रेम मिळत आहे. समाजाच्या विकासासाठी सर्वांच्या साथीने पुढे जायचे आहे, असे श्री. भांडेकर म्हणाले.

अध्यक्षीय भाषणात श्री. अक्कर यांनी सांगितले की, समाजाच्या विकासकार्याचा गाडा एखाद्या तांत्रिक बाबींमुळे बंद पडू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. मंडळाचे अध्यक्ष म्हणून शरदराव भांडेकर यांची समाजाप्रती तळमळ, धडपड उल्लेखनीय ठरत आहे. अशाच लाखमोलाच्या माणसांची समाजाला पुढेही गरज आहे. आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असे अक्कर म्हणाले. सभेत विविध ठराव मंजूर करण्यात आले. सूत्रसंचालन केशव कुंभकर्ण यांनी केले. सुभाष दगडे यांनी आभार मानले. सभेला पुणे , मुंबई, नाशिक, कोल्हापूर, नागपूर, विदर्भ, मराठवाडा यासह राज्यभरातील मध्यवर्ती मंडळाचे जुने आणि नवीन नोंदणी झालेले सदस्य, विविध ठिकाणच्या कालिकादेवी संस्थान; तसेच महिला, युवक मंडळ, सांस्कृतिक, सामाजिक संस्थाचे पदाधिकारी, सदस्य आणि कासार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!