लीलाताई शिंदेंचा चारठाणकर पुरस्काराने सन्मान

परभणी : मराठवाड्यातील  बालसाहित्यिक प्राध्यापक लीलाताई फकीरराव शिंदे (औरंगाबाद) यांना २०२२ या वर्षाचा  ‘वीर महिला सौ.गीताबाई चारठाणकर’ पुरस्कार गुरुवारी (१६ जून) सायंकाळी सेलू येथे प्रदान करण्यात आला.

अध्यक्षस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा विजया कोठेकर होत्या. या वेळी प्रमुख पाहुण्या प्राचार्या डॉ.सविता शेटे, सचिव ललिता गिल्डा, उपाध्यक्षा करुणा बागले, शुभदा चारठाणकर, मधुरा खारकर, वरुणा कुलकर्णी, वर्षा डोंग्रजकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गीताबाई चारठाणकर यांच्या स्मृती निरंतर जागृत राहाव्यात. त्यांच्या कार्याची प्रेरणा इतरांनी घ्यावी, या उद्देशाने सेलू (जि.परभणी) येथील महिला मंडळातर्फे मराठवाड्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दरवर्षी एका महिलेला या पुरस्काराने गौरविण्यात येते. पुरस्काराचे हे २८ वे वर्ष आहे. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

सत्काराला उत्तर देतांना लीलाताई शिंदे म्हणाल्या, ” पुरस्काराने मन अभिमानाने भरून आले आहे. सेलू हे माझ्या लिखाणाचे उर्जा केंद्र आहे. लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार बालसाहित्य निर्मितीतून झाला पाहिजे.” डॉ.सविता शेटे यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर विचार मांडले. त्या म्हणाल्या, ” पालकांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्याशी वागणे गरजेचे आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सजग पालकत्वाची जबाबदारी   महत्वपूर्ण आहे.”

प्रास्ताविक ललिता गिल्डा, सूत्रसंचालन सुनंदा डासाळकर, तर सीमा आष्टीकर यांनी आभार मानले. प्रा.सरोज, प्रा.चिताळे, डॉ.संध्या कुरळे, विजय घेवारे, बाबासाहेब चारठाणकर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी सरिता उमरीकर, उज्ज्वला धर्माधिकारी, ज्योती जोशी, रोहिणी कुलकर्णी  ज्योत्स्ना जवळेकर, वांभुरकर, मनीषा कुलकर्णी, मनीषा पांडे, सुभेदार, देवधर, मीरा जोशी आदींसह महिला मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.

सत्काराला उत्तर देतांना लीलाताई शिंदे म्हणाल्या, ” पुरस्काराने मन अभिमानाने भरून आले आहे. सेलू हे माझ्या लिखाणाचे उर्जा केंद्र आहे. लहान मुलांच्या मानसिकतेचा विचार बालसाहित्य निर्मितीतून झाला पाहिजे.” डॉ.सविता शेटे यांनी ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर विचार मांडले. त्या म्हणाल्या, ” पालकांनी मुलांच्या मानसिकतेचा विचार करून त्यांच्याशी वागणे गरजेचे आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सजग पालकत्वाची जबाबदारी   महत्वपूर्ण आहे.”

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!