परभणी : सेलू ( जि.परभणी) येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था ही स्थापनेपासूनच गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच माणुसकी जागविणार्या शिक्षणाचे केंद्र ठरलेली असून, सद्यस्थितीत सर्वच स्तरावर माणुसकी जागविणार्या शिक्षणाची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन औरंगाबाद येथील राज्य वस्तू व सेवा कर अधिकारी संगीता आकात यांनी शनिवारी (दोन जुलै) केले.
नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ८३ वा वर्धापनदिन व दलितमित्र श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त शनिवारी संस्थेच्या विविध घटक संस्थांतील गुणवंतांचा गौरव करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून संगीता आकात बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुण्या म्हणून माजी विद्यार्थिनी तथा औरंगाबाद येथील राज्य वस्तू व सेवाकर अधिकारी संगीता आकात उपस्थित होत्या. या वेळी संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी, सचिव प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्रभारी प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे, सुखानंद बेंडसुरे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
‘मी कशी घडले’ उलगडून सांगतांना संगीता आकात म्हणाल्या, संस्थेच्या स्वागताने मी भारावून गेले आहे. या संस्थेने मला मोठी स्वप्नं पाहायला शिकविले. ती सत्यात उतरविण्यासाठी सामर्थ्य दिले आणि उंच भरारी घेण्यासाठी पंखांना बळ दिले. इथल्या प्रत्येक व्यक्तीत्वांची प्रेरणा आणि प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबियांनी, मैत्रिणींनी दिलेले पाठबळ माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत मोलाचे ठरत आले आहे. कोणत्याही क्षेत्रात यशासाठी विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरविले पाहिजे. ते गाठण्यासाठी निर्धाराने, मोकळेपणाने परिश्रमपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.”
विविध परीक्षा, कला, क्रीडा क्षेत्रातील २८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरवपत्र, पारितोषिक देऊन प्रातिनिधिक स्वरूपात गौरव करण्यात आला ; तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल शिक्षक, कर्मचारी, पीएचडी प्राप्त प्राध्यापकांचादेखील या वेळी सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘अमृतप्रेरणा’ प्रश्नमंजुषा स्पर्धा झाली. विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. प्रारंभी श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यावर्षी संस्थेत बालवाडी ते पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दहा हजार पार गेली आहे. यातूनच दर्जेदार, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विद्यार्थी आणि पालकांचा नूतन शिक्षण संस्थेकडे ओढा कायम असल्याचे दिसून येते, असे सचिव डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी प्रास्ताविकातून नमूद केले. डॉ.एस.एम.लोया यांनी अध्यक्षीय मनोगतात; विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी नागरिक संस्थेची कायम बलस्थाने असल्याचे स्पष्ट केले. संयोजक एस.व्ही.पाटील यांनी अहवाल, तर सच्चिदानंद डाखोरे व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. संगीता खराबे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. यादीवाचन व्ही.एन.क्षीरसागर, प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर, तर आभार पी.एन.बाहेकर यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
…या गुणवंतांचा झाला गौरव
इयत्ता पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा : प्रणव घोडके, श्रेया दयावरवार, संकल्प रामवल्लभ राठी, श्रावणी दत्तात्रय हेलसकर, साक्षी राऊत (एनटीएस), अपर्णा पवार, अनुराधा वाघ (एनएमएमएस), सावनी करवा (रेखाकला ग्रेड), सपना मगर, तन्मय पाथरकर , मैत्री देशपांडे (इयत्ता दहावी), अश्विनी पवार, मिनाक्षी सारस्वत (बारावी कला), रक्षा जैन, संध्या आवटे (वाणिज्य), सुशांत माकुडे ( विज्ञान), सिध्देश्वर आघाम (एमसीव्हीसी), काव्या मेहता (पदवी परीक्षा), राष्ट्रीय खेळाडू : संस्कृती केशव डहाळे (योगासन), सार्थक माळकर, श्रुती दत्तात्रय खंदारे (टेनिस व्हॉलीबॉल), तेजस्विनी महाजन, सपना खरात, अमृता दिग्रसकर (वूशू), आंतर विद्यापीठीय खेळाडू : सौरभ शिंदे ( सॉफ्टबॉल), सोमनाथ महाजन (योगासन), प्रथमेश भांडवले, साक्षी शेळके (बेसबॉल) , विविध पुरस्कारप्राप्त शिक्षक : सतीश नावाडे, गणेश माळवे, डी.डी.सोन्नेकर, सुरेश हिवाळे, डॉ.रमेश बैनवाड, प्रा.नागेश कान्हेकर, प्रा.महेश कुलकर्णी, प्रा.अजय उंडेगावकर, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, प्रा.अमित कुलकर्णी, ग्रंथपाल शिवाजी शिंदे, प्रा.के.बी.विश्वामित्रे, पीएचडी पदवीप्राप्त प्रा.के.के.कदम, प्रा.एस.एस.उगले, प्रा.शेख गुलाब, प्रा.सुषमा सोनी, प्रा.शिवराज घुलेश्वर; तसेच मुख्याध्यापिका संगीता खराबे, कीर्ती राऊत यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.
‘मी कशी घडले’ उलगडून सांगताना संगीता आकात म्हणाल्या, संस्थेच्या स्वागताने भारावून गेले आहे. या संस्थेने मला मोठी स्वप्नं पाहायला शिकविले. ती सत्यात उतरविण्यासाठी सामर्थ्य दिले आणि उंच भरारी घेण्यासाठी पंखांना बळ दिले. इथल्या प्रत्येक व्यक्तीत्वांची प्रेरणा आणि प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबियांनी, मैत्रिणींनी दिलेले पाठबळ माझ्या आजवरच्या वाटचालीत अत्यंत मोलाचे ठरत आले आहे. कोणत्याही क्षेत्रात यशासाठी विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येय ठरविले पाहिजे. ते गाठण्यासाठी निर्धाराने, मोकळेपणाने परिश्रमपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.”