परभणी : ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी १८ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार असून, मोर्चामध्ये जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्ह्यातील ओबीसी नेत्यांनी केले आहे.
सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात बुधवारी, सहा जुलै रोजी आयोजित बैठकीत जिल्ह्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांनी मार्गदर्शन केले. ‘उठ ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो ” या जयघोषात बैठक सुरू झाली. प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी परभणीचे उपमहापौर भगवानराव वाघमारे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य स्वराजसिंह परिहार, नानासाहेब राऊत, शेकाप नेते कीर्तीकुमार बुरांडे, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, जिल्हा परिषद सदस्य अविनाश काळे , गणेश नाईकवाडे, धनगर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष आनंद बनसोडे, सावता परिषदेचे जिल्हाध्यक्ष कृष्णा कटारे, ॲड. संजय केकान, राजेंद्र नागरे, हरिहर वझे, शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंगल कथले, सखाराम बोबडे , दामोदर दळवे, प्रभाकर कुऱ्हे, तहसीनखान आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. ॲड.प्रभाकर गिराम, विठ्ठल कोकर, महादेव गायके ,ॲड.सुभाष भरदम साहेब, सचिन कोरडे, विनोद तरटे, बाळू प्रधान, अभिजीत राजूरकर, भारत इंद्रोके, संदीप बोकन, आनंद डोईफोडे, सिद्धू मगर, प्रल्हाद गोरे ॲड.देवराव दळवे, भागवत दळवे, आनंद भिसे, कृष्णा काटे, किशोर कारके, विठ्ठल महाराज कारके आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन महादेव गायके, आभार भागवत दळवे यांनी मानले.