ओबीसी समाजाच्या महामोर्चाने परभणी दणाणले

परभणी : ओबीसी आरक्षण कायम ठेवा, ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा, ओबीसी आरक्षण जाहीर होईपर्यंत निवडणुका पुढे ढकलला, मंडल आयोगाच्या संपूर्ण शिफारशी लागू करा आदी प्रमुख मागण्यांसह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, ओबीसी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली सोमवारी (१८ जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला. चिंब पावसात महामोर्चात दिल्या गेलेल्या आरक्षणासह विविध मागण्यांच्या घोषणांनी शहर दणाणून गेले.
शनिवार बाजारपासून दुपारी साडेबाराच्या सुमारास गोंधळी कलावंतांच्या जोरदार संबळ नादाने मोर्चाला सुरुवात झाली. ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अभी नहीं तो कभी नहीं या घोषणांनी परिसर दणाणून गेला. लाल, पिवळे झेंडे आणि मोर्चेकऱ्यांनी घातलेल्या’ मी ओबीसी ‘ टोप्यांनी लक्ष वेधले.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील मैदानात जाहीर झाली. माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे अध्यक्षस्थानी होते. या वेळी नानासाहेब राऊत, प्रा.किरण सोनटक्के, विशाल बुधवंत, कीर्तीकुमार बुरांडे, राजन क्षीरसागर, संतोष मुरकुटे, हरिभाउ शेळके, सुरेश भुमरे, रामप्रभु मुंढे, विठ्ठल रबदडे, गंगाप्रसाद आणेराव, अनंत बनसोडे, स्वराजसिंह परिहार, डॉ.धर्मराज चव्हाण, नंदाताई राठोड, शुकंतला मुंढे, अरुणा काळे आदींची उपस्थिती होती. मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरुच ठेवण्याचा निर्धार ओबीसी नेत्यांनी या वेळी व्यक्त केला. जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. प्रा.तुकाराम साठे, एन.आय.काळे, विठ्ठल घुले, कृष्णा कटारे, राजेश बालटकर, ॲड.प्रभाकर गिराम, सचिन कोरडे, विठ्ठल कोकर, आदींसह जिल्ह्यातील ओबीसी समाजातील सर्वपक्षीय नेते, विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रिमझिम पावसात शनिवार बाजारपासून दुपारी साडेबाराच्या सुमारास गोंधळी समाजाच्या संबळ नादाने मोर्चाला सुरुवात झाली. ऊठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, अभी नहीं तो कभी नहीं या घोषणांनी परिसर दणाणून गेला. लाल, पिवळे झेंडे आणि मोर्चेकऱ्यांनी घातलेल्या’ मी ओबीसी ‘ टोप्यांनी लक्ष वेधले.

(छायाचित्र : सदा महाजन)

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!