परभणी : भारतीय विमा कामगार संघटनेच्या (AIIEA) पश्चिम क्षेत्राचे २३ वे त्रैवार्षिक अधिवेशन ११ ते १३ सप्टेंबर या कालावधीत सातारा येथे होणार आहे.
या अधिवेशनामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण, नवीन कामगार संहिता, राष्ट्रीय पेन्शन योजना आदी महत्त्वपूर्ण विषयांवर वर चर्चा होणार आहे. ही माहिती संघटनेचे शमशोद्दीन शेख यांनी मंगळवारी (दोन ऑगस्ट) दिली. ‘एलआयसी ‘मध्ये नोकर भरती, वेतन पुनरावृत्ती, पेन्शनमध्ये सुधारणा आदी संघटनेच्या मागण्या आहेत. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.अशोक भोईटे असतील, पश्चिम क्षेत्र विमा कामगार संघटनाचे अध्यक्ष कॉम्रेड ए.जी.ढोकपांडे, सरचिटणीस हितेंद्र भट्ट, कॉम्रेड सर्जेराव भुजबळ, कॉम्रेड एस.व्ही.चव्हाण, कॉम्रेड राजेश भालेराव, कॉम्रेड शमशोद्दीन शेख यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सातारा येथील शाहू स्टेडियम जवळ हॉटेल सुरूबान येथे आयोजित अधिवेशनाला विमा कामगार, कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.