सेलू : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत सेलू येथील कृषी महाविद्यालयाच्या ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम आणि कृषी औद्योगिक संलग्नता उपक्रमांतर्गत हातनूर येथे शनिवारी, सहा ऑगस्ट खरीप शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्राचार्या डॉ.ए.ए. चव्हाण, सुधाकर रोकडे, महेंद्र गाढे, प्रा.एम.एन.करंजे आदींची उपस्थिती होती. शेतकर्यांनी सोयाबीन व कापूस पिकांवरील मुख्य किडी, त्यांचा प्रसार आणि नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धतीचा अवंलंब; तसेच शेतीसाठी शेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे आहे. सरी व वारंबा पद्धतीने पिक लागवड करण्याची गरज; तसेच आधुनिकतेची जोड शेतीसाठी आवश्यक असून मोबाईल ॲपचा वापर शेतकर्यांनी करण्याचे अवाहन या वेळी करण्यात आले. सूत्रसंचालन कृषीदूत गोविंद जावळे, तर आभार प्रा.एस.बी.गडदे यांनी केले. कार्यक्रम अधिकारी प्रा. डंबाळे, प्रा.इंगळे, प्रा.व्ही.एम. देशमुख, पोलीस पाटील रामचंद्र पारवे,कृषीकन्या व कृषीदूत यांनी पुढाकार घेतला.