Open Competition : आंतरभारतीतर्फे खुली राष्ट्रीय निबंधलेखन स्पर्धा
१५ सप्टेंबरपर्यंत निबंध स्वीकारणार, सहभागी होण्याचे आवाहन
परभणी : पूज्य साने गुरुजींनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्टतर्फे ” महात्मा गांधींची प्रासंगिकता : वर्तमान समस्या सोडविण्यासाठी महात्मा गांधी मार्गाची उपयुक्तता ” या विषयावर राष्ट्रीय स्तरावर खुली निबंधलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. परभणी जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी सोमवारी ही माहिती दिली.
स्पर्धेला कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. वय व भाषेचे बंधन नाही. शब्द मर्यादा किमान ७०० ते कमाल २५०० शब्द आहे. विजेत्यांना जिल्हा व राष्ट्रीय स्तरावर रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. निबंध स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. टाईप अथवा हस्तलिखित निबंध पोस्टाने; तसेच ९८८१५२५५१० या मोबाईल क्रमांकावर पीडीएफ स्वरुपात ऑनलाईन पाठवावेत, असे आवाहन राष्ट्रीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.सदाविजय आर्य, सरचिटणीस अमर हबीब, जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी केले आहे.
जिल्हा व राष्ट्रीय पारितोषिक
विजेत्यांना परभणी जिल्हास्तरावर प्रथम : रोख दोन हजार रुपये, द्वितीय : दीड हजार रुपये, तृतीय : एक हजार रुपये, राष्ट्रीयस्तरावर प्रथम : रोख दहा हजार रुपये, द्वितीय : सात हजार रुपये, तृतीय : तीन हजार रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शालेय , महाविद्यालयीन विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, युवक, युवती, महिला, नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा. सहभाग व अधिक माहितीसाठी परभणी जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर (९८८१५२५५१० ) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.