ब्रह्माकुमारीज् : सद्गुणांची समृद्धी आमुलाग्र बदल घडविते

ब्रह्माकुमारीज् : सद्गुणांची समृद्धी आमुलाग्र बदल घडविते 

सेलूतील स्नेहमेळाव्यात बी.के.दीपा बहेनजी यांचे प्रतिपादन ; ब्रह्माकुमारी केंद्राचा उपक्रम, आमदार मेघना बोर्डीकर, दीपा बहेन, राजेंद्र लहाने, एकनाथ पौळ यांची उपस्थिती

ब्रह्माकुमारीज् : सद्गुणांची समृद्धी आमुलाग्र बदल घडविते

सेलू : जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सद्गुणांची समृद्धी वाढविण्यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे,असे प्रतिपादन कुंभार पिंपळगाव येथील ब्रह्माकुमारी दीपा बहेनजी यांनी येथे केले. सेलू जि.परभणी येथील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालय आणि शिंदे टाकळी येथील पाठशाळेतर्फे रविवारी (११ सप्टेंबर) आयोजित स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. त्यावेळी दीपा बहेनजी बोलत होत्या. या वेळी आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, एकनाथ पौळ, सरपंच ज्ञानेश्वर पवार, बी.के.दीपा बहेनजी, बी.के.सविता बहेनजी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

ब्रह्माकुमारीज् : सद्गुणांची समृद्धी आमुलाग्र बदल घडविते

दीपा बहेनजी म्हणाल्या, ” मन आणि बुद्धीच्या एकाग्रतेने स्वदर्शन, स्वचिंतन केले, तर श्रेष्ठ विचार, कर्म आणि सद्गुणांचा विस्तार होत राहातो. त्यामुळे शांती, सुख, प्रेम, आनंद, पवित्रता आणि ज्ञानाच्या साहाय्याने जीवनात आमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी सद्गुणांची समृद्धी वाढविण्यावर प्रत्येकाने भर दिला पाहिजे.आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, ” ब्रह्माकुमारीज् केंद्राच्या‌ माध्यमातून ईश्वरीय ज्ञानाचे संस्कार आम्हा कुंटुंबावर आहेत. राजयोगाचे ज्ञान आत्मज्ञानाची अनुभूती देणारे ज्ञान आहे. त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. ”

जीवनाच्या सर्वच क्षेत्रात परिवर्तन घडविण्यासाठी ईश्वरीय ज्ञान आवश्यक आहे, असे राजेंद्र लहाने यांनी सांगितले, तर एकनाथ पौळ, म्हणाले, ” या ज्ञानमार्गाने परिवर्तन दिसून आले. ते अनुभवाची संधी स्नेहमेळावामुळे प्राप्त झाली.” या वेळी शिंदे टाकळी पाठशाळेतील मनिषा, सारिका, यमुना, रामेश्वरभाई तसेच ज्ञानेश्वर महाराज यांचा दीपा पवार यांनी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सीमा बहेनजी यांनी केले, वैशाली बहेनजी यांनी आभार मानले.महाप्रसादाने सांगता झाली. कार्यक्रमाला महिला, पुरुष व ब्रह्माकुमारी परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, ” ब्रह्माकुमारीज् केंद्राच्या‌ माध्यमातून ईश्वरीय ज्ञानाचे संस्कार आम्हा कुंटुंबावर आहेत. राजयोगाचे ज्ञान आत्मज्ञानाची अनुभूती देणारे ज्ञान आहे. त्याचा लाभ प्रत्येकाने घेतला पाहिजे. “

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!