राष्ट्रवादी : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू

राष्ट्रवादी : जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरू

माजी आमदार विजय भांबळे : जिंतूर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक उत्साहात 

जिंतूर : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सभासद नोंदणी अभियान अंतर्गत पक्षाच्या क्रियाशील व प्राथमिक सभासद नोंदणीसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या अध्यक्षतेखाली जिंतूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना भांबळे म्हणाले, ” अतिवृष्टी अनुदान, पिक विम्यापासून वंचित शेतकरी, विजेचा प्रश्न, विविध योजनेतील लाभार्थींचे थकलेले अनुदान आदी सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर विद्यमान लोकप्रतिनिधी ; तसेच सरकार गंभीर नाही. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक मार्गाने जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी शासनाला भाग पाडू.”

जिंतूर येथील मौलाना हुसेन मदनी हॉलमध्ये बुधवारी ही बैठक पार पडली. यावेळी ग्रामीण व शहरामधील प्रमुख कार्यकर्त्यांना सभासद नोंदणी फॉर्मचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलताना माजी आमदार विजय भांबळे म्हणाले, की मागील बऱ्याच दिवसापासून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे. शासनाने मदत करण्याएवजी अतिवृष्टीच्या यादीतून जिंतूर तालुका वगळला आहे. जिंतूर तालुक्यात ग्रामीण भागात वेळेत ट्रान्सफार्मर न मिळाल्यामुळे सामान्य नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षीच्या पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. मागील तीन वर्षाच्या काळात संजय गांधी व श्रावणबाळ योजने अंतर्गत लाभार्थ्याची एकही पगार मंजूर करण्यात आलेली नाही. आदी प्रकारचे गंभीर विषय निर्माण झालेले असून, विद्यमान आमदारांच्या विचाराचे देशात व राज्यात सरकार असून, त्या या प्रश्नांकडे गंभीरतेणे बघताना दिसून येत नाहीत. यापुढे जनेतेच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनात्मक मार्गाने शासनास सर्व प्रश्न सोडवण्यास भाग पाडू. प्रत्येक गावातील व शहरातील नागरिकांचे कामे करा व कुठे अडचण आल्यास मला कळवा. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा विचार गावा गावात घेवून जा. येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, बाजार समिती व ग्रामपंचायत निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. असे आवाहन भांबळे यांनी केले.

या कार्यक्रमात गजानन कुटे (धानोरा) जावेद पठाण (जिंतूर), शेषेराव महाळनर, पिंटू वलेकर (हिवरखेडा ) आदींनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला, त्यांचे रुमाल व हार घालून पक्षात स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, मनोज थिटे, सबिया बेगम कपिल फारुकी, बाळासाहेब भांबळे, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, विठ्ठल घोगरे, मनीषाताई केंद्रे, गणेशराव इलग, शरदराव मस्के, विजय खिस्ते, किरण दाभाडे, मनोहर डोईफोडे, उस्मान पठाण, शाहेद बेग मिर्झा, दत्तराव काळे, श्यामराव मते, दलमीर पठाण, आहेमद बागवान, सोहेल सर, संजय (बंटी) निकाळजे, चंद्रकांत बहिरट, शोएब जानिमिया, शौकत लाला, संजय काळे, मकसूद पठाण, शंकर जाधव, किशन मानवते, खयुम कादरी, आशाताई खिल्लारे यांच्यासह ग्रामीण व शहरातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!