Enthusiastic : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा उद्योजकांशी मनमोकळा संवाद

Enthusiastic : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा उद्योजकांशी मनमोकळा संवाद

सेलूतील १३२ के.व्ही.वीज उपकेंद्रासह पायाभूत सुविधांवर मंथन, आपुलकीच्या भेटीने उद्योजकांमध्ये उत्साह

Enthusiastic : जिल्हाधिकारी आंचल गोयल यांचा उद्योजकांशी मनमोकळा संवाद

सेलू (जि.परभणी) : उद्योजकांच्या समस्या समजून घेण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल सूद गोयल यांनी, गुरुवारी (१५ सप्टेंबर) सेलू (जि.परभणी) येथे भेट दिली. नव्याने सुरू होणार्‍या उद्योगांची पाहणी केली. एका कार्यक्रमात उद्योजकांशी मनमोकळा संवाद साधला.

येथील कोहिनूर रोप्स परिसरात हा कार्यक्रम झाला. या वेळी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, अधीक्षक अभियंता चौधरी, गटविकास अधिकारी विष्णू मोरे, अभियंता दशरथ तेलंग, अभियंता माने, जिल्हा उद्योग केंद्राचे पत्की, उद्योजक जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, विजय बिहाणी, सुरेंद्र तोष्णीवाल, रामनाना खराबे, संजय पावड़े, आनंद सिनगारे,  नवलकिशोर काबरा, प्रकाशचंद बिनायके, मेघा बिनायके, नायब तहसीलदार प्रशांत थारकर आदींची उपस्थिती होती. उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्या व त्यामुळे होणारे नुकसान याबद्दल गोयल यांनी या वेळी खंत व्यक्त केली. सेलू शहरातील १३२ के.व्ही.वीज उपकेंद्राचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात येईल; तसेच अकृषिक शेती संदर्भातील उपाययोजना आणि उद्योजकांसाठी जिल्हा कार्यालयात महिनाभरात एक खिडकी योजना चालू करण्यात येईल, याबद्दल गोयल यांनी आश्वस्त केले. समस्या सोडविण्यासाठी मार्ग ; तसेच पर्यायी व्यवस्था याबाबत सर्व संबंधित विभागाचे अधिकारी व घटकांकडून जाणून घेतले.

या वेळी सेलूचे औद्योगिक वैभव, विकासाविषयी उद्योजकांची तळमळ नीलेश बिनायके यांनी व्यक्त केली. सेलूतील मातीच्या कणांकणात, पाण्याच्या थेंबाथेंबात आणि उद्योजकांच्या रक्तात उद्योग आहे. परंतु; मूलभूत सुविधांअभावी उद्योजकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशी मनमोकळी व्यथा मांडली. सेलू येथे १३२ के.व्ही.वीज उपकेंद्र सुरू होण्याची किती नितांत गरज आहे, या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीकडेही बिनायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, तर उद्योगधंद्याच्या माध्यमातून शासनाला मिळणारे महसुली उत्पन्न आणि त्याप्रमाणात पायाभूत सुविधांचा असलेला वाणवा, याचा उहापोह अविनाश बिहाणी यांनी मनोगतातून केला. रस्त्यांची दुरावस्था, खंडीत वीज वितरण प्रणालीमुळे होणारे नुकसान, नवीन उद्योग उभारताना अकृषिक शेती करण्याच्या किचकट प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी आनंद सोनी यांनी मांडल्या.

या निमित्ताने गोयल यांनी सेलू शहरात नव्याने सुरू होत असलेल्या कनकश्री स्पिनर्स ह्या सूतगिरणीला भेट देऊन, तेथील उद्योग प्रक्रिया समजून घेतली. संचालक प्रकाशचंद बिनायके, मेघा बिनायके या वेळी उपस्थित होत्या. या वेळी जिल्हाधिकारी गोयल व उपस्थित मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. दरम्यान, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सेलूतील उद्योजकांच्या कार्याची भरभरून प्रशंसा केली; तसेच अडचणी जाणून व्यथा समजून घेतल्या. मार्ग काढण्यासाठी आपुलकी व्यक्त केली. याबद्दल उद्योजकांनी आनंद व्यक्त केला. प्रास्ताविक नीलेश बिनायके, सूत्रसंचालन महेश खारकर यांनी केले. कार्यक्रमासाठी उद्योजक नीलेश बिनायके, महेश बाहेती, आनंद सोनी, अविनाश बिहाणी व शहरातील ज्येष्ठ, अनुभवी, तरुण उद्योजकांनी पुढाकार घेतला.

सेलूचे औद्योगिक वैभव, विकासाविषयी तरूण उद्योजकांचा दृष्टीकोन, तळमळ नीलेश बिनायके यांनी व्यक्त केली. सेलूतील मातीच्या कणांकणात, पाण्याच्या थेंबाथेंबात आणि उद्योजकांच्या रक्तात उद्योग आहे. परंतु; मूलभूत सुविधांअभावी उद्योजकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते, अशी मनमोकळी व्यथा मांडली. सेलू येथे १३२ के.व्ही.वीज उपकेंद्र सुरू होण्याची किती नितांत गरज आहे, या अनेक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागणीकडेही बिनायके यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले, तर उद्योगधंद्याच्या माध्यमातून शासनाला मिळणारे महसुली उत्पन्न आणि त्याप्रमाणात पायाभूत सुविधांचा असलेला वाणवा, याचा उहापोह अविनाश बिहाणी यांनी मनोगतातून केला. रस्त्यांची दुरावस्था, खंडीत वीज वितरण प्रणालीमुळे होणारे नुकसान, नवीन उद्योग उभारताना अकृषिक शेती करण्याच्या किचकट प्रक्रियेमध्ये येणाऱ्या अडचणी आनंद सोनी यांनी मांडल्या. 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!