प्रचंड नुकसान : सोयाबीन, कापसाचे सेलू तालुक्यात मोठे नुकसान; पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी 

प्रचंड नुकसान : सोयाबीन, कापसाचे सेलू तालुक्यात मोठे नुकसान; पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी 

सेलू तालुक्यातील पिकांना परतीच्या पावसाचा जबर तडाखा 

सेलू,जि.परभणी : तालुक्यातील रायपूर, हातनूर, साळेगाव परिसरात 11 व 12 आक्टोबर रोजी अतिमुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीस आलेले सोयाबीन व कापूस या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामे करावेत. बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना गुरुवारी, १३ ऑक्टोबर रोजी, तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. मागील दहा वर्षामध्ये रायपुरसह परिसरात एवढ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. अतिमुसळधार, ढगफुटी सदृश पावसाने मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीचे पंचनाम्याचे आदेश देवून बाधित शेतकर्‍यांना शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर रामेश्वर गाडेकर, शाम गाडेकर, सर्जेराव गाडेकर, बाबासाहेब गडकर, अमोल गाडेकर, रामेश्वर गाडेकर, अजय गाडेकर, महेश गाडेकर, ज्ञानेश्वर हिंगे, भगवान गाडेकर, दिनेश गाडेकर आदींच्या सह्या आहेत.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!