पालकमंत्र्यांचे आदेश : अतिवृष्टी, सततच्या व परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश !
शेतकऱ्यांना आवाहन : ऑनलाईन,ऑफलाईन पध्दतीने संबंधित यंत्रणेला लेखी स्वरुपात पूर्वसूचना नोंदविण्याचे प्रशासनाकडून आवाहन
परभणी : माहे ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या परतीच्या पावसामुळे जिल्ह्यातील काही महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टी व काही महसूल मंडळामध्ये सततच्या पाऊसामुळे शेतीपिकांचे नुकसान झालेले आहे. शेतात सखल भागात पाणी साचल्याने पीक वाया गेले आहे. करिता संपूर्ण महसूल विभाग, कृषी विभाग यांना तात्काळ जायमोक्यावर जाऊन पिकाये पंचनामे करण्याचे निर्देश पालममंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी दिले आहेत. पंचनाम्याच्या प्रक्रियेतून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटू नये याचीही दक्षता घेण्याबाबतचे निर्देश जिल्हाधिकारी परभणी श्रीमती आंचल गोयल यांना दिले आहेत. यापमाणे महसूल विभाग व कृषी विभाग यांनी समन्वयाने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या कामाला प्रत्यक्षपणे सुरवात केली आहे.
पिक विमा योजनेत सहभाग नोंदविलेल्या शेतकर्यांनी नुकसान झाल्यास पूर्वसूचना देण्याचे आवाहन पालकमंत्री यांनी केले आहे. सद्यास्थितीत सोयाबीन पिकाची काढणीस सुरवात झालेली आहे; तसेच तूर व कपाशी शेतात वाढीच्या अवस्थेत आहे. या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असल्यास पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकन्यांना त्यांच्या अधिसुचित पिकांबाबत नुकसान भरपाई लागू आहे. त्याबाबतचा तपशिल खालीलप्रमाणे आहे.
1. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भुस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या अधिसूचित पिकाचे नुकसान हे वैयक्तिक पंचनामे करून निश्चित करण्यात येते.
2. काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत जास्तीत जास्त 14 दिवस (काढून ठेवल्यापासून दोन आठवड्यापर्यंत ) गारपीट, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येईल. जिल्ह्यामध्ये पिक विमाधारक शेतकन्यांचे सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्यास सदरील शेतकऱ्यांनी नुकसानीच्या 72 तासाच्या आत खालील ई-मेलवर, क्रॉप इन्शुरन्स ॲपवर किंवा टोल फ्री वर कॉल करून आपल्या पिकांचे नुकसान झाल्याची पूर्वसुचना पिक विमा कंपनीला कळवणे बंधनकारक आहे.
. क्रॉप इन्शुरन्स ॲप लिंक :https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central 2. टोल फ्री क्रमांक 1800 1037712 3. ईमेल- customersupport@icicilombard.com अथवा ऑनलाईन पद्धतीने पूर्वसूचना देण्यास अडचणी येत असल्यास, ऑफलाईन पध्दतीने पीक विमा कंपनीचे जिल्हा व तालुका कार्यालयात तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषि अधिकारी कार्यालय संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय याचेकडे लेखी स्वरुपात पूर्वसूचना नोंदविण्यात यावी, असे आवाहन पालकमंत्री, जिल्हा प्रशासन व कृषी विभाग यानी केले आहे.