शरद युवा संवाद यात्रा :सोशल मिडियापेक्षा ग्राउंडवर लक्ष केंद्रीत करा : प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांचे कार्यकर्त्यांना आवाहन
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख : सेलूत युवा संवाद यात्रेला मोठा प्रतिसाद, माजी आमदार विजय भांबळे, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
सेलू (जि.परभणी) : जिंतूर, सेलू तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करा. शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा मंजूर करून आर्थिक मदत द्या, अशी आग्रही मागणी, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित शरद युवा संवाद यात्रेच्या वेळी करण्यात आली आहे. या वेळी बोलतांना युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणाले, कार्यकर्त्यांनी सोशल मिडियापेक्षा ग्राउंडवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे.”
सेलू येथील येथील साई नाट्यगृहात शनिवारी, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता शरद युवा संवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती. माजी आमदार विजय भांबळे अध्यक्षस्थानी होते. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.
सेलू व जिंतूर तालुक्यात अतिवृष्टी जाहीर करावी व दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा; तसेच अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. युवकांनी शरदचंद्र पवार यांचे विचार तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी आमदार विजय भांबळे यांनी या वेळी केले.
महेबुब शेख म्हणाले, ” राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक कार्यकर्त्यांनी गावागावात बैठका घेऊन, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे केली पाहिजेत. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांचे विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करावेत. सोशल मिडियापेक्षा कार्यकर्त्यांनी ग्राउंड लेव्हलवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे. मोदीजींनी मारलेल्या थापा, कशा खोट्या आहेत हे लोकांना पटवून सांगितले पाहिजे. शरदचंद्र पवार सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे, दूरदृष्टी ठेवणारी नेते आहेत. ” या वेळी मराठवाडा विभागीय युवक प्रदेश कार्याध्यक्ष चंदन पाटील नागराळकर, जिल्हाध्यक्ष रितेश काळे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेक्षा भांबळे-बोराडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, माजी उपाध्यक्ष राजेंद्र लहाने, मराठवाडा प्रचार प्रमुख सारंगधर महाराज, युवक जिल्हाध्यक्ष अजय डासाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माऊली ताठे, कार्याध्यक्ष सुधाकर रोकडे, शहराध्यक्ष रघुनाथ बागल, पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम पावडे, चंद्रकांत गाडेकर, गोरख भालेराव, आनंद डोईफोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य ॲड.बालासाहेब रोडगे, महिला तालुकाध्यक्ष निर्मला लिपणे, आशा गायकवाड, योगेश काकडे, रामेश्वर गाडेकर, पवन मोरे, अनंता पावडे, शिवराम कदम, विशाल देशमुख, नाना बोबडे, दिनेश गाडेकर, विलास जाधव आदींसह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.
सेलू व जिंतूर तालुक्यात परतीच्या सततच्या पावसामुळे प्रचंड प्रमाणात सोयाबीन, कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने दोन्ही तालुक्यांत अतिवृष्टी जाहीर करावी. शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ मंजूर करून, आर्थिक मदत तातडीने मंजूर करावी. अशी मागणी माजी आमदार विजय भांबळे यांनी या वेळी केले.