श्री तुळजाभवानी शुगर्स : स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या हस्ते पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ
सेलू : अखेर बळीराजाचे स्वप्न झाले साकार, शेतकऱ्यांमध्ये आनंद
सेलू जि.परभणी : सेलू तालुक्यातील आडगाव दराडे येथील श्री तुळजाभवानी साखर कारखान्याचा पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष, राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते बुधवारी (१९ ऑक्टोबर)उत्साहात संपन्न झाला.
या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर, मीनाताई बोर्डीकर, चेअरमन भावना मुंगसे बोर्डीकर, स्वप्ना अमोल यादव, वनिता चाफेकर, विजयराव वरपुडकर, ब्रिजगोपाल तोष्णीवाल, नाथराव कदम, अजित मगर, कार्यकारी अधिकारी सुशील पाटील, सरपंच बबन जायभाये, सुनील भोंबे, सदाशिव निकम, प्रदीप चौधरी, गजानन घुगे, एकनाथ देशमुख, सुनील मते आदींची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज आशीर्वादपर भाषणामध्ये म्हणाले, ” शेतकरी बांधवांसाठी बोर्डीकर यांनी साखर कारखाना उभारणीचा घेतलेला निर्णय खरोखरच अतुलनीय आहे. पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला आहे. या शुभ कार्यात सदैव पाठीशी आहे” रामप्रसाद बोर्डीकर म्हणाले, ” मतदारसंघातील शेतकरी बांधवांसाठी या कारखान्याची उभारणी केली असून, सर्वसामान्य जनतेला याचा नक्कीच फायदा होणार आहे. “आमदार मेघना साकोरे बोर्डीकर आणि भावना मुंगसे-बोर्डीकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, की माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न अखेर पूर्ण झालं. याचा आम्हा दोघींना सार्थ अभिमान आहे. यापुढे देखील मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आणि आर्थिक उन्नती होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. अशी ग्वाही दिली. या वेळी कारखान्याच्या व्यवस्थापनातील अधिकारी, कर्मचारी, सेलू तालुक्यातील व जालना जिल्ह्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरी महाराज आशीर्वादपर भाषणामध्ये म्हणाले, ” शेतकरी बांधवांसाठी बोर्डीकर यांनी साखर कारखाना उभारणीचा घेतलेला निर्णय खरोखरच अतुलनीय आहे. पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ झाला आहे. या शुभ कार्यात सदैव पाठीशी आहे”