आंतरभारती: राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सेलूत गौरव
सेलूतील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात कार्यक्रम : मान्यवरांची उपस्थिती, परभणी जिल्हास्तरीय विजेत्यांचा रोख पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन सन्मान
सेलू जि.परभणी : पूज्य सानेगुरुजी यांनी स्थापन केलेल्या आंतरभारती ट्रस्ट द्वारा, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त आयोजित खुल्या राष्ट्रीय निबंध स्पर्धेतील परभणी जिल्हास्तरीय विजेत्यांना शुक्रवारी (२१ ऑक्टोबर) गौरविण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाच्या वतीने डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम जयंती निमित्त व वाचन प्रेरणा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे जेष्ठ सदस्य ज्ञानोबा बोराडे होते. माजलगाव येथील श्रीतुळजाभवानी अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ, साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उद्योजक रामप्रसाद घोडके, पत्रकार नारायण पाटील, गंगाधर कान्हेकर, प्रा.नागेश कान्हेकर, प्रवीण माणकेश्वर, ग्रंथालयाचे सचिव प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, सहसचिव चंद्रशेखर मुळावेकर, जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर, कथामालेच्या कल्पना हेलसकर आदींची उपस्थिती होती. प्रथम पारितोषिक प्राप्त मानवत येथील प्रणिता दीपक केरे यांना रोख दोन हजार रूपये, द्वितीय पारितोषिक रोख दीड हजार रूपये विभागून कीर्ती राऊत (सेलू) व गीता कत्ते (परभणी), तर तृतीय पारितोषिक रोख एक हजार रूपये विभागून आयेशा खान पठाण (परभणी), युवराज माने, सेलू यांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परीक्षक डॉ.गंगाधर गळगे, डॉ.भाग्यश्री धामणगावकर, संभाजी रोडगे यांचाही प्रमाणपत्राने सन्मान करण्यात आला. या वेळी मार्गदर्शन करतांना श्री शेजुळ म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वाढता वापर यामुळे वाचन संस्कृती प्रभावित झाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पेमेंट व्यवहारही वाढले आहेत. अशा संभाव्य धोके टाळण्यासाठी आर्थिक साक्षर असणे आणि अर्थशिस्त, अर्थभान जपणे आवश्यक आहे. चौफेर वाचनातून हे साध्य होते. याची जागृती गरजेची आहे”
प्रारंभी डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन करण्यात आले. या वेळी आडळकर यांनी साईबाबा बँकेचा, तर शेजुळ यांनी श्री तुळजाभवानी बँकेचा प्रेरणादायी प्रवास सांगितला. सूत्रसंचालन जिल्हा संयोजक बाबासाहेब हेलसकर यांनी केले. माजी जिल्हा परिषद सभापती अशोक काकडे, अशोक कासार, डी.के.माकोडे गुरुजी, प्रा.प्रभाकर रावते, ललिता गिल्डा, एम.आर.पटेल, डी.व्ही.मुळे, रामराव लाडाणे, गिरीश लोडाया, मुख्याध्यापक नारायण सोळंके, सर्जेराव लहाने, रवी कुलकर्णी, रवी मुळावेकर आदींसह वाचक, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल महादेव आगजाळ, पंडितराव जगाडे, प्रा.अनंत मोगल, शाम पवार, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके, अमोल बिडवे, आदित्य थोरे आदींनी परिश्रम घेतले.
या वेळी मार्गदर्शन करतांना श्रीतुळजाभवानी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शहाजी शेजुळ म्हणाले, “डिजिटल तंत्रज्ञान आणि माध्यमांचा वाढता वापर यामुळे वाचन संस्कृती प्रभावित झाली आहे. ऑनलाईन, डिजिटल पेमेंट व्यवहारही वाढले आहेत. अशा संभाव्य धोके टाळण्यासाठी आर्थिक साक्षर असणे आणि अर्थशिस्त, अर्थभान जपणे आवश्यक आहे. चौफेर वाचनातून हे साध्य होते. याची जागृती गरजेची आहे”