जबरदस्त व्हायरल : सेलूतील हा संदेश होतोय‌ सध्या…

जबरदस्त व्हायरल : सेलूतील हा संदेश होतोय‌ सध्या…

सेलू, ता.३१ : सामाजिक,सांस्कृतिक शैक्षणिक,साहित्यिक वारसा लाभलेल्या सेलू (जि.परभणी) शहरातील चळवळीशी संबंधित एक संदेश समाज माध्यमातून सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे. तो, जसाच्या तसा…

नम्र आवाहन…

सेलू शहरातील मराठवाडा साहित्य परिषद औरंगाबादच्या सर्व आजीव सभासद बंधू भगिनींना सप्रेम नमस्कार. बंधू आणि भगिनींनो, आपणास सेलू शहरामध्ये मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा स्थापन करायची आहे. परंतू सेलूच्या साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ज्यांच कोणतही योगदान नाही. अशी एक व्यक्ती स्वतःच्या कोणत्या तरी स्वार्थापोटी शाखा निर्माण करू पाहते आहे. जे की, आपल्या कोणाच्याच तत्वात बसणारे नाही. तेव्हा सर्व आजीव सभासदांना नम्र विनंती की, आपण सगळेजण जाणते आहात. सेलू शहरांत सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रात कोणाचं सक्रिय, महत्त्वाचं योगदान आहे. सर्वांना कोण योग्य प्रकारे समन्वय साधून, संघटीत ठेवू शकतो, केवळ आर्थिकच नाही, तर श्रम, विचार, संयोजन या दृष्टीने कोणाचं खर योगदान आहे. हे सर्व आपण जाणतो. हे आपल्याला वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वजण सुज्ञ आहोत. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने ज्यांचं योगदान आहे. त्याच योग्य व्यक्तीला सेलू शाखेच्या पदावर सन्मानाने आपण संधी दिली पाहिजे. यासाठीच हे नम्र आवाहन.

बंधू आणि भगिनींनो, केवळ कुणी वयाने ज्येष्ठ आहे. केवळ काही पुस्तक प्रसिद्ध आहेत. केवळ खुप ओळखी आहेत किंवा केवळ खूप पैसा आहे. म्हणून जर एखादी व्यक्ती पदावर येण्याचा अट्टाहास करत असेल किंवा शाखा निर्माण करून वेगळे काहीतरी हित साधण्याचा प्रयत्न करत असेल, आपल्याला केवळ कार्यकर्ता करण्याचा प्रयत्न करत असेल. तर हे चुकीचे आहे. आपल्या सेलू शहराला सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्ट्या उज्वल परंपरा आहे. या सांस्कृतिक, साहित्यिक परंपरेत आपल्याला मोलाची भर घातलायची असेल. तर मराठवाडा साहित्य परिषद शाखा सेलूचे नेतृत्व, धुरा अशाच हातात द्यावी लागेल. जो व्यक्ती आधीपासूनच सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात सक्रिय योगदान देत आलेला आहे. आणि पुढेही तन, मन, धन, श्रमाने सक्रिय योगदान देईल. म्हणूनच मराठवाडा साहित्य परिषद शाखा, सेलू जिल्हा परभणीची धुरा अशाच कार्यक्षम, निरपेक्ष हातात देणे आवश्यक आहे. की, ज्यांचं आधीही योगदान होतं. आणि पुढेही उत्स्फूर्त असे समर्पित योगदान राहील. आपण सर्वजण सुज्ञ आहात. विवेकी आहात. तेव्हा आपणा सर्वांना नम्र आवाहन आहे की, कोणत्याही भूलथापांना बळी न पडता सजग राहून शाखा स्थापन करतेवेळी योग्य त्या व्यक्तीची निवड आपण करावी. लवकरच होऊ घातलेल्या बैठकीस उपस्थित राहून आपली मतमतांतरे व्यक्त करून, लोकशाही पद्धतीने योग्य व्यक्तीच आपण आपल्या शाखेमध्ये निवडूयात. कारण आपण साहित्यिक आहोत, संवेदनशील, सृजनशील आहोत. आपल्याला आपली मतं, आपली दृष्टी आहे. तेव्हा स्वाभिमानाने शाखा स्थापन करूयात.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!