VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख
परभणीत कार्यक्रम, डॉ.आनंद नाडकर्णी यांनी घेतल्या दिलखुलास मुलाखतींना श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद
Authored By Babasaheb Helaskar, Selu
परभणी : भिक्षेकर्यांचे डॉक्टर अभिजित सोनवणे, जागतिक विक्रम करणार्या पद्मश्री शितल महाजन, गडकिल्ल्यांचे अभ्यासक मारुती (आबा) गोळे, अवकाश विज्ञान संवादक रुचिरा सावंत आणि व्हायोलिन वादक रमाताई चोबे या संघर्षयात्रींनी ‘वेध’ मधून उलगडलेल्या प्रेरणादायी प्रवासाने श्रोते अंतर्मुख होऊन गेले.
प्रसिद्ध सल्लागार मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, कवी, संवादक डॉ.आनंद नाडकर्णी यांनी यांच्या संकल्पनेतील ‘वेध’चा परभणीतील सहावा आणि महाराष्ट्रातील हा शंभरावा उपक्रम रविवारी (२० नोव्हेंबर) उत्साहात पार पडला. श्रोत्यांची मोठी उपस्थिती होती. डॉ.नाडकर्णी यांनी त्यांच्या खास शैलीत ‘संघर्षयात्रीं’च्या मुलाखती घेतल्या. व्यवसायाने वकील असलेले आणि १४ देशातील १२०० गडकिल्ल्यांचे अभ्यासक मारुती (आबा) गोळे यांनी मावळा होऊन जगण्याला फार मोठे भाग्य लागते. असे सांगितले. गडावर फिरल्यावर शरीर आणि मन तंदुरुस्त राहाते. इतिहासाची आवड निर्माण होते. भारतातील सर्वच ४६०० गड पाहणार आहे. नवीन संशोधकाला पर्यटकांना सोयीचे व्हावे, यासाठी पुस्तक काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. अवकाश विज्ञान संवादक रुचिरा सावंत यांनी अवकाश विज्ञानातील संघर्षाची मांडणी केली. डॉ.अभिजित सोनावणे यांनी भिक्षेकर्यांचा डॉक्टर म्हणून मांडलेल्या संघर्षाने श्रोते अंतर्मुख होऊन गेले. वेद नाही समजला तरी चालेल पण वेदना समजून घ्या. त्या दूर करण्यासाठी एकरुप आणि एकजीव होऊन काम करा. गावकरी आणि भिक्षेकरी यामधील दूर करण्यासाठी भिक्षेकरी- कष्टकरी-गावकरी हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रत्येकाने पुढे येण्याची गरज आहे. पण आयुष्यात भीक देणे बंद करा, असे आवाहन सोनवणे यांनी केले.
जागतिक विक्रम करणार्या पद्मश्री शितल महाजन यांनी, मी हे करू शकते ही, हा ठाम विश्वास ठेवला की संघर्षातून देखील यशाची वाट मोकळी होते, असे सांगितले. मुलांचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी पालकांचे प्रयत्न हवेत. पैसा, प्रतिष्ठा पेक्षा कुटुंबियांसोबत राहणे आणि हवेत उडताना जमीनवर पाय राहावे, हे जास्त महत्त्वपूर्ण आहे. देशात पॅराशूट ॲकडमी सोबत साहसी क्रीडा खेळ क्रीडा प्रकार रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे शितल महाजन यांनी सांगितले. पुणे येथील व्हायोलिन वादक रमाताई चोबे यांनी संगीतातील समन्वय संघर्ष मांडला. डॉ.अभिजित सोनवणे, पद्मश्री शितल महाजन, मारुती (आबा) गोळे, रुचिरा सावंत यांचा अटळ विधायक आणि स्वतःबरोबर इतरांचा विकास साधणारा संघर्ष आहे. त्यामुळे ‘संघर्षयात्री’ या ‘वेध’च्यानिमित्ताने, टाळता येणारे असे दोन संघर्ष प्रत्येकाने आपल्या जीवनात जरूर टाळावेत. पहिला, दोन अहंकार एकमेकांशी भांडतात यातून निर्माण होणारे संघर्ष आणि दुसरा ज्यावेळी दोन संकुचित स्वार्थ एकमेकाला भिडतात त्या वेळी होणारा यातून निर्माण होणारे संघर्ष प्रत्येकाला टाळता आले पाहिजेत, असे डॉ.आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी वेधचे संयोजक मधुकर नायक, कृषीभूषण कांतराव देशमुख, प्राचार्य बाळासाहेब जाधव, श्रीमती मेघाताई देशमुखशिक्षणाधिकारी प्रा.विठ्ठल भुसारे, संजय ससाणे, दादासाहेब टेंगसे,अरुण टाक,डॉ.शाम देशमुख,डॉ.सुहास विभूते,डॉ. दिलीप शृंगारपुतळे इंजि.नारायण चौधरी, प्रवीण मुदगलकर, अबोली लोहार, भूषण भुजबळ, विष्णू वैरागड, विजय नायक, भूषण घोडके, रितेश झांबड जैन,प्रवीण सोनोने, चंचल निकम, हर्षा अंभुरे, प्रतिमा नरवाडे, उमेद मिलके डॉ. राजकुमार भारूका, सदाशिव वसेकर, सुनील देशमुख, गोपाल रोडे, कृष्णा निकम, मेघा देशमुख, डॉ.मेघा बागुल, उज्वला उबाळे, प्रिया ठाकूर, कल्पना यरमळ, वंदना कदम, सुनिता ससाणे, माधव मुंढे, बाळु बुधवंत, पूजा कळमकर, दर्शन कळमकर, उषा निकम, अश्विनी वसेकर, विजय साळुंके, विनीता मुथा, मंजुषा जामगे, प्रा.सीमा चौधरी, विशाखा नायक, सुनिता नायक,रेखा नायक, प्रिया देशमुख. रेखा श्रृंगारपुतळे, राजेश्वर देशमुख, रेणूका खुडे, समृद्धी सूर्यवंशी, प्रा.संतोष अवतारे, सोहम उबाळे, सुनील यादव, विनोद गोंगे, वैष्णवी काकडे, नितीन पेडगावकर, महेश बासटवार, मंगेश रत्नपारखी, विद्या मालेवार, राकेश गर्जे, संगीता सोळुंके,उमेश रोडे,सुधीर सोनुनकर, गायक : अनुष्का शहाणे, सौम्या घोडके, हर्षदा शहाणे, वैभवी बुरांडे, भक्ती तरटे, श्रावणी शहाणे, विदिता उडाणशिव, खेडकर, वादक : हार्मोनियम : हरिष शहाणे सिंथेसायझर : प्रथमेश शहाणे तबला, ढोलकी : ज्ञानेश्वर पाथरकर साईड रिदम : मोहन आल्हाट, कैवल्य टाक, स्वराज शहाणे संगीत संयोजन : अरविंद शहाणे, प्रफुल्ल शहाणे, शशिनजी कुळकर्णी, सचिन गांवकर, कृष्णा निकम, शैलेश मेदगे, रविंद्र सोमवंशी, अरुण टाक आदींसह वेध संयोजन समितीने परिश्रम घेतले.
‘संघर्षयात्री’ या ‘वेध’च्यानिमित्ताने, टाळता येणारे असे दोन संघर्ष प्रत्येकाने आपल्या जीवनात जरूर टाळावेत. पहिला, दोन अहंकार एकमेकांशी भांडतात यातून निर्माण होणारे संघर्ष आणि दुसरा ज्यावेळी दोन संकुचित स्वार्थ एकमेकाला भिडतात त्या वेळी होणारा यातून निर्माण होणारे संघर्ष प्रत्येकाला टाळता आले पाहिजेत, असे डॉ.आनंद नाडकर्णी यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी वेध संयोजन समितीने परिश्रम घेतले.
हेही वाचा : छत्रपती संभाजीराजे भोसले : घराघरात स्वराज्य उभारणार
हेही वाचा : जालना-नांदेड महामार्ग : …अन्यथा मुंबईला पायी दिंडी; सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा
हेही वाचा : VEDH : संघर्षयात्रींच्या प्रेरणादायी ‘वेध’ ने श्रोते अंतर्मुख