संत श्रीज्ञानेश्वर महाराज : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विवेकानंद विद्यालयात कार्यक्रम

संत श्रीज्ञानेश्वर महाराज : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विवेकानंद विद्यालयात कार्यक्रम

संतविचार राष्ट्रबांधणीसाठी पोषक : विजय चौधरी यांचे प्रतिपादन

संत श्रीज्ञानेश्वर महाराज : संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विवेकानंद विद्यालयात कार्यक्रम

सेलू, जि.परभणी : शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माऊलींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शंकर शितोळे, तर प्रमुख वक्ते म्हणून शिक्षक विजय चौधरी उपस्थित होते..
विजय चौधरी म्हणाले, की धर्म ,पंथ,जात यापलीकडे जाऊन संतांनी समाजजागृती केली ,लोकांत आत्मविश्वास पेरून राष्ट्रनिर्मितीची बांधणी केली.नहि ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते अर्थात ज्ञानापेक्षा या जगात सर्वश्रेष्ठ काहीच नाही. मराठी भाषेचे महत्व त्यांनी पटवून दिले. ज्ञानेश्वरांना माऊली असेही म्हटले जाते. सामुहिक पसायदानाने सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल कौसडीकर, गजानन साळवे, रागिणी जकाते , विनोद मंडलिक ,शंकर राऊत ,अभिषेक राजूरकर ,काशिनाथ पांचाळ ,शारदा पुरी, स्वप्नाली देवडे यांनी प्रयत्न केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!