चैतन्याचा सोहळा : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

चैतन्याचा सोहळा : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

सेलूतील २२१ वा यात्रोत्सव : श्रीसाईबांबाचा रथ, लेझीम, संबळ पथकाने वेधले लक्ष

चैतन्याचा सोहळा : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

सेलू ( जि.परभणी) : संत श्री साईबाबांचे सद्गुरू, सेलू शहराचे ग्रामदैवत संत श्री केशवराज बाबासाहेब महाराज (व्यंकूशाह) यांच्या २२१ व्या यात्रा महोत्सवातील श्री दत्तजयंतीचा मुख्य दिवस होता. यानिमित्ताने ‘श्रीं’ चा पालखी सोहळा उत्साहात पार पडला. गुरुवारी, आठ डिसेंबर रोजी काल्याचे कीर्तन झाले. पुढील दहा दिवस यात्रा चालणार आहे. बोचऱ्या थंडीत भाविकांची दर्शनासाठी, यात्रेचा आनंद घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळेल.
करोना काळात खंडित झालेली यात्रेची परंपरा यावर्षी उत्साहात सुरू झाली आहे. पारंपरिक पालखी मिरवणुकीतही काहीसे बदल करण्यात आले होते. यात्रेनिमित्त ३० नोव्हेंबर पासून मंदिर परिसरात विविध सांस्कृतिक, धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रम झाले. सप्ताहात नंदकुमार गोंदीकर महाराजांनी श्रीमद् भागवत कथा निरुपण केले. नागनाथ महाराज विडोळीकर यांच्या नेतृत्वाखाली यजुर्वेद संहिता पारायण झाले. मंगळवारी कथेची महाप्रसादाने सांगता झाली. महोत्सवानिमित्त गौरी खांडेकर (मालाड) यांचे पाच दिवस कीर्तन झाले. गीता जयंती व श्री केशवराज बाबासाहेब महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त ओवीबद्ध चरित्राचे सामुहिक पाठ, श्रीमद् भगवद् गीता पाठ झाले. वसंतबुवा मंडलिक यांचे श्रींच्या चरित्रावर, तर पुरुषोत्तम महाराज वालूरकर यांचे हरि किर्तन झाले. बुधवारी दत्तजयंतीनिमित्त महाआरतीनंतर पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी समोर श्री साईबाबांचा रथ, झांज पथक, संबळ पथक, भजनी मंडळ व केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या मुलींच्या लेझीम पथकाने लक्ष वेधले. गुरुवारी दुपारी चार वाजता सुनील महाराज आष्टीकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. विविध कार्यक्रमांत मृदंगाचार्य केदार तांबट, विठ्ठल काळे, दत्तात्रय टोलमारे, संवादिनी नागनाथमहाराज विडोळीकर, ज्ञानेश्वर माऊली औरंगाबादकर, तबलावादक गिरीश बालासाहेब दीक्षित, आनंद अनंतराव राऊत, गंगाधर कान्हेकर यांची साथसंगत केली. दरम्यान, यात्रेनिमित्त छोटे, मोठे व्यापारी यांनी विविध प्रकारची दुकाने थाटली आहेत. आकाश पाळणे व विविध मनोरंजनात्मक खेळ व्यावसायिकांनी गर्दी केली आहे. बोचऱ्या थंडीत पुढील दहा दिवस पंचक्रोशीतील भाविकांची दर्शन, यात्रेसाठी गर्दी पाहायला मिळेल.

चैतन्याचा सोहळा : श्रीकेशवराज बाबासाहेब महाराजांची पालखी मिरवणूक उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!