सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

सानेगुरूजींना अभिवादन, मान्यवरांचे मार्गदर्शन

घनसावंगी : रांजणी येथील सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शनिवारी, २४ डिसेंबर रोजी सानेगुरुजी यांची जयंती विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी पर्यवेक्षक अतुल हेलसकर होते, तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती अंजली वायकोस आणि श्री महेश सोनवणे उपस्थित होते. सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सर्व शिक्षक उपस्थित होते.या कार्यक्रमाची सुरुवात खरा तो एकचि धर्म या प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक श्रीमती अंजली वायकोस यांनी केले.त्यांनी साने गुरुजी व त्यांचे सुसंस्कारी कुटुंब या बद्दल माहिती दिली. या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे आयोजित करण्यात आली होती. त्यात आरती तोडकर, वैतूषा टेकाळे यांनी श्यामची आई या पुस्तकातील कथा सांगितल्या. ऋतुजा खराबे हीने, “बलसागर भारत होवो”हे गीत सादर केले. अध्यक्षीय भाषणात अतुल हेलसकर यांनी साने गुरुजी यांची शिक्षणातील धडपड व शिक्षणाबद्दल आस्था आणि त्यांनी शिक्षक म्हणून केलेले कार्य, याविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले. आभार महेश सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.


 


हेही वाचा : सानेगुरुजी जयंती : विद्यार्थ्यांनी सुरात गायली ‘खरा तो एकचि धर्म’ प्रार्थना

हेही वाचा ; श्रीराम प्रतिष्ठान : सेलूतील सुरभि महोत्सवाचे थाटात उद्घाटन

हेही वाचा : सानेगुरूजी जयंती : रांजणीच्या सरस्वती भुवन प्रशालेत गीतगायन, कथाकथन रंगले

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!