अर्थसंकल्प : आर्थिक स्थिरता, संपन्नता देणारा : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

अर्थसंकल्प : आर्थिक स्थिरता, संपन्नता देणारा : आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर

देशातील ’सप्तर्षी’ सूत्रातील घटकांचा विकास साधण्याचा मोदी सरकारचा संकल्प स्वागतार्ह

सेलू / परभणी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले यंदाचे बजेट महिला, विद्यार्थी, शेतकरी, नोकरपेशावर्ग, व्यावसायिकांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवणारे आहे. हा अर्थसंकल्प सर्वव्यापक, सर्वसमावेशक व देशाचे आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेणारा आहे. यावरून भारताच्या ऐतिहासिक आर्थिक स्थिरता व संपन्नतेची कल्पना येईल,अशी प्रतिक्रिया जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिली आहे.
आमदार साकोरे यांनी म्हटले आहे की, देशातील ’सप्तर्षी’ सूत्रातील घटकांचा विकास साधण्याचा मोदी सरकारचा संकल्प भविष्यातील देशाच्या आर्थिक उन्नतीची शाश्वती देणारा हा अर्थसंकल्प आहे. करदात्यांना 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमाफीची क्रांतिकारी घोषणा असेल, शेतकरी पीक कर्ज योजनेसाठी 20 लाख कोटी रुपये रकमेची वाढ असेल, महिला सन्मान बचत पत्रांवरील आकर्षक व्याजदराची तरतूद असेल, अशा शाश्वत योजनांना मूर्त रूप देण्याचे काम या अर्थसंकल्पात झाले आहे. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे मी मनस्वी स्वागत करते. ग्रामविकास, गोरगरीब जनता, आदिवासी, आर्थिक व सामाजिक मागासवर्गीय घटकांना, मध्यमवर्गियांना आर्थिक शक्ती देणार्‍या या अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींची ’राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेची प्रेरणा दिसून आली. मागील नऊ वर्षात जगात दहाव्या क्रमांकावर असणारी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. हे पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे यश आहे. कोविड महामारीच्या काळात उद्भवलेल्या अभूतपूर्व संकटाला देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थ नेतृत्वाखाली मात दिली. या संकटामुळे संपूर्ण जगातील अर्थव्यवस्था मंदीच्या विळख्यात असताना ’आयएमएफ’ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आणि आर्थिक सर्वेक्षणाच्या आधीच देशाचा आर्थिक वृद्धीदर 6.8 टक्के राहणार असल्याचे भाकीत वर्तवले आहे, असेही आमदार साकोरे यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात पंतप्रधान मोदींची ’राष्ट्रप्रथम’ या संकल्पनेची प्रेरणा दिसून आली. मागील नऊ वर्षात जगात दहाव्या क्रमांकावर असणारी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आज पाचव्या क्रमांकावर येऊन पोहोचली आहे. हे पंतप्रधान मोदींच्या आर्थिक धोरणांचे यश आहे.

– आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर
जिंतूर-सेलू

हेही वाचा : राष्ट्रवादीचाच झेंडा उंच : औरंगाबाद शिक्षक मतदार संघात विक्रम काळेंचा विजयी ‘विक्रम’; सर्वत्र जल्लोष

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!