घणाघात : सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे मोठे नुकसान; शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादा कडाडले

घणाघात : सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याचे मोठे नुकसान; शिंदे-फडणवीस सरकारवर अजितदादा कडाडले

पाथऱीतील शेतकरी मेळाव्याला मोठा प्रतिसाद, मान्यवरांची उपस्थिती

सेलू/ पाथरी  : शेतकऱ्यांच्या अडचणी समजून न घेणारे, कोट्यवधी रूपये उधळून स्वतःची टिमकी वाजविणाऱ्या, लोकशाही मानायला तयार नसणार्‍या आणि बेरोजगारी, वाढत्या महागाईकडे दुर्लक्ष करणार्‍या शिंदे-फडणवीस सरकाराच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, असा घणाघात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी, दहा फेब्रुवारी रोजी पाथरी येथे केले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यावतीने शुक्रवारी ( १० फेब्रुवारी) सायंकाळी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी आमदार बाबाजानी दुर्राणी, नवनिर्वाचित शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार विजय भांबळे, माजी आमदार मधुसुदन केंद्रे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ.संजय रोडगे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, पाथरी बाजार समितीचे सभापती अनिल नखाते, भावना नखाते. राजेंद्र लहाने, दादासाहेब टेंगसे, तालुकाध्यक्ष एकनाथ शिंदे, माजी नगराध्यक्ष जुनैदखॉं दुर्राणी, विनायक पावडे आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

अजित पवार म्हणाले, की स्वत:ला सर्वसामान्यांचे सरकार म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकाराने सर्वसामान्य जनतेकडेच पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती भरमसाठ वाढतायेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्य माणूस पिळून निघतोय. एकीकडे शेतकऱ्यांना मदत जाहीर करायची आणि द्यायची नाही. पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत. दररोज तीन ते चार शेतकरी आत्महत्या करतातेय. हे सरकारचे अपयश आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेल्या सात महिन्यात दीड ते दोन लाख कोटींची गुंतवणुकीचे पाच-सहा प्रकल्प गुजरातला गेले. नवीन एकही प्रकल्प अजून आणू शकले नाहीत. उद्योगांना पोषक वातावरणासाठी सरकाराकडे वेळ नाही. आदित्य ठाकरे, आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर भ्याड हल्ले होतात. याचे उत्तर सरकाराने दिले पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशीकांत वारीशे यांची चिरडून हत्या झाली, असे आसुरी काम करणाऱ्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे.अशी मागणी अजित पवार यांनी या वेळी केली. प्रास्ताविक जुनैदखान दुर्राणी यांनी केले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मेळाव्याला शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

..तोपर्यंत निवडणुका नाहीत

आधीच्या सरकाराने मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देऊन गलिच्छ राजकारण सरकारकडून केले जात आहे. हे सरकार लोकशाही मानायला तयारी नाही म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाहीत. जोपर्यंत भाजपला व शिंदे गटाला आपल्या विचारांचे उमेदवार निवडून येतील, असे वाटत नाही, तो पर्यंत निवडणुका होणार नाहीत,असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

अनावरण : स.गो.नखाते यांचा पुतळा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी : विरोधी पक्ष नेते अजित पवार

SEND OFF : प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!