पारनेरकर मातृधर्म पुरस्कार : एकत्र कुंटुंबातूनच संस्काराची पेरणी होते : सरोज देशपांडे
सेलूतील सोहळ्यात बकुळाबाई पिसे यांचा पारनेरकर पुरस्काराने गौरव, पूज्य डॉ.विष्णू महाराज पारनेरकर यांची उपस्थिती
सेलू : संस्काराचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज देण्यासाठी एकत्र कुटुंब पद्धतीची आवश्यकता आहे. एकत्र कुंटुंबातूनच खऱ्या अर्थाने संस्काराची सहज पेरणी होत असते, असे मत परभणी येथील सामाजिक कार्यकर्त्या सरोज देशपांडे यांनी सेलू (जि.परभणी) येथे व्यक्त केले.
पारनेर येथील श्रीगुरूसेवा मंडळ व भारतीय पूर्णवादी नारी फोरमच्या वतीने औरंगाबाद येथील बकुळाबाई लक्ष्मणराव पिसे यांना सती सौ.मनकर्णिका माता पारनेरकर मातृधर्म पुरस्काराने गुरूवारी (१६ फेब्रुवारी) गौरविण्यात आले. त्यावेळी देशपांडे बोलत होत्या. श्री केशवराज बाबासाहेब मंदिर सभागृहात सायंकाळी पूज्य विष्णू महाराज पारनेरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा झाला. या वेळी पूर्णवादी नारी फोरमच्या अध्यक्ष अनघाताई चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या सरोज देशपांडे, पारनेरच्या श्रीगुरुसेवा मंडळाचे अध्यक्ष गुणेशदादा पारनेरकर, सेलू येथील जीवन कला मंडळ व पूर्णवाद परिवारचे अध्यक्ष डॉ.पी.एन.कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी सरोज देशपांडे यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या, एकत्र कुटुंबातूनच खर्या अर्थाने संस्काराची पेरणी होते. माता सोसते; संस्कारही देते. अनेक आघाड्यावर झुंज देत इतरांचे जीवन फुलवते. त्यागाची ती मूर्ती वाटते आणि याचेच दर्शन पुरस्कारार्थी बकुळाबाई यांच्यामध्ये घडले, असे देशपांडे यांनी नमूद केले. बकुळाबाई पिसे यांनी ‘मला माहेरी जावसं वाटलं गं ‘ या गीतातून भावना व्यक्त केल्या. पाथरीचे उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी व ऐश्वर्या लाहोटी दाम्पत्याने डॉ.विष्णू महाराज पारनेरकर यांचे गुरुपूजन केले. भावना वाघ यांनी गणेश वंदना सादर केली. प्रास्ताविक प्रा.राणी गोयल सूत्रसंचालन माधवी दिवाळकर यांनी केले. अनघाताई चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला जीवन कला मंडळ व पूर्णवाद परिवार, भाविक उपस्थित होते.
सरोज देशपांडे यांनी एकत्र कुटुंब पद्धतीचे महत्त्व सांगितले. त्या म्हणाल्या, एकत्र कुटुंबातूनच खर्या अर्थाने संस्काराची पेरणी होते. माता सोसते; संस्कारही देते. अनेक आघाड्यावर झुंज देत इतरांचे जीवन फुलवते. त्यागाची ती मूर्ती वाटते आणि याचेच दर्शन पुरस्कारार्थी बकुळाबाई यांच्यामध्ये घडले, असे देशपांडे यांनी नमूद केले. बकुळाबाई पिसे यांनी ‘मला माहेरी जावसं वाटलं गं ‘ या गीतातून भावना व्यक्त केल्या.