परसबाग स्पर्धा : सेलूतील श्री.के.बा.विद्यालय, लोणी येथील जिल्हा परिषद शाळा जिल्ह्यात सर्वप्रथम
अथक परिश्रमातून पिकविला भाजीपाला, तिवठाणा शाळेचा द्वितीय, तर मैराळ सावंगीची शाळा तृतीय क्रमांकावर
सेलू : तालुकास्तरीय परसबाग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटाकाविलेल्या सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय व पाथरी तालुक्यातील लोणी (बुद्रुक) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळाेने परभणी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,असे नाव दिले आहे. या माध्यमांतून राज्यातील शाळांमधून परसबागेच्या माध्यमातून ताजा भाजीपाला पिकिवला जाऊन त्याचा वापर पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पोषक तत्वे मिळावीत. या उद्देशाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग स्पर्धा आयोजित केली आहे. यामध्ये तालुका व जिल्हास्तरीय स्पर्धाही पार पडली. यामध्ये श्री केशवराज बाबासाहेब विद्यालय सेलू आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी बुद्रुक ता.पाथरी यांना विभागून प्रथम क्रमांक देण्यात आला., तर जिल्हास्तरावर जि.प.प्रा.शा तिवठाणा ता.सोनपेठ या शाळेचा द्वितीय क्रमांक आला, तर जि.प.प्रा.शा मैराळ सावंगी ता.गंगाखेड या शाळेचा तृतीय क्रमांक आला आहे. या शाळांना अनुक्रमे दहा हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये रोख बक्षीस देखील देण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकारी विट्ठल भुसारे आणि लेखाधिकारी अमोल आगळे यांनी निकालजाहीर केला आहे.
जिल्हास्तरावर प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे लेखाधिकारी अमोल आगळे, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक त्र्यंबक पोले आदींसह प्रगतिशील शेतकरी आदींनी परसबागेची पाहणी केली.
श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाच्या यशाबद्दल सेलूचे गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, केंद्रप्रमुख सय्यद सरदार, विजय चिकटे, मुख्याध्यापक तथा सेंद्रिय शेती तज्ञ भुजंग थोरे , मनीषा धापसे आदींसह श्री.के.बा.शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध जोशी, सचिव महेशराव खारकर, सहसचिव अभय सुभेदार, उपाध्यक्ष डॉ सुनील कुलकर्णी,जयंत दिग्रसकर,ऍड.किशोर जवळेकर,ललित बिनायके,प्रवीण माणकेश्वर, डॉ प्रवीण जोग,विष्णुपंत शेरे,अशोक चामणीकर,मुख्याध्यापक सुभाष नावकर,मुख्याध्यापक प्रदीप कौसडीकर आदींनी अभिनंदन केले आहे.
केंद्र शासनाने शालेय पोषण आहार योजनेला आता प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना,असे नाव दिले आहे. या माध्यमांतून राज्यातील शाळांमधून परसबागेच्या माध्यमातून ताजा भाजीपाला पिकिवला जाऊन त्याचा वापर पोषण आहारात होऊन विद्यार्थ्यांना पोषक तत्वे मिळावीत. या उद्देशाने शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी परसबाग स्पर्धा आयोजित केली आहे.