कापूस बारा हजार रुपये करा : माजी आमदार भांबळे; जिंतूर, सेलूत जोरदार धरणे आंदोलन
तहसील कार्यालयासमोर आंदोलन, शेतकऱ्यांसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग
सेलू,जि.परभणी : शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान, पिक विमा मंजूर करणे, शेतमालाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणे, सक्तीची वीज तोडणी थांबविणे, सोयाबीनला आठ, तर कापसाला प्रतिक्विंटल बारा हजार रुपये हमी भाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वात बुधवारी (२२ फेब्रुवारी ) जिंतूर व सेलू येथे जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने जिंतूर व सेलू तहसील कार्यालयासमोर आयोजित या आंदोलनात आमदार भांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक काकडे, राजेंद्र लहाने, पुरुषोत्तम पावडे, रामराव उबाळे, माऊली ताठे, सुधाकर रोकडे, निर्मला लिपणे, अजय डासाळकर, आप्पसाहेब डख, मदन पवार, ताठे महाराज, माऊली घुगे, अॅड. बालासाहेब रोडगे, विशाल देशमुख, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी सभापती रणजीत गजमल, झोल पाटील, कारके महाराज, प्रदिप ढवळे, रमेशराव डख, परवेज लाला, रामेश्वर गाडेकर, बाजार समितीचे माजी संचालक, सरपंच, उपसरपंच आदींसह शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मागील वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२ या महिन्यात सततचा पाऊस व अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठवला होता. या सर्व शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ मदत करणे आवश्यक होते.परंतु, तसे न होता राज्य शासनाने अतिवृष्टी बाधित गटातून जिंतूर तालुका वगळला आहे. तसेच जिंतूर तालुक्यातील १,१३,७८० शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे, त्यामध्ये शेतकरी हिस्सा , राज्य शासन हिस्सा व केंद्र शासन हिस्सा असे संयुक्तिक ४१,९४,७८,७५६ /- एवढी रक्कम विमा कंपनीला अदा करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विमा कंपनीने ३१४,६०,१३,४४८/- एवढ्या रक्कमेच्या नुकसान भरपाईची हमी घेतलेली आहे. त्यापैकी केवळ ७० हजार शेतकऱ्यांनाच १८,६४,५०,१९५/- रु एवढाच पिक विमा मिळाला आहे किंवा मिळणार आहे. तालुक्यातील ईतर विमा धारक शेतकऱ्यांचे नुकसान पाहता सर्व शेतकऱ्यांना विमा मिळणे आपेक्षित आहे, त्यामुळे राज्य शासनाने वरील बाबीचा गांभीर्यपूर्वक विचार करून संबंधित पीकविमा कंपनीला जिंतूर तालुक्यातील सर्व विमा धारक शेतकऱ्यांना विमा देण्यासाठी आदेशित करावे.
सध्या रब्बी हंगाम चालू असून शेतकऱ्यांचा शेतमाल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात येत आहे, त्यात मुगाची खरेदी हमीभावापेक्षा कमी दराने झाली असून हरभरा देखील शासनाकडून जाहीर झालेल्या हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी करण्यासाठी ‘हमीभाव खरेदी केंद्र’ तात्काळ सुरु करण्यासाठी संबंधितास आदेशित देण्यात यावेत. तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये हमी भाव व सोयाबीनला ८ हजार रुपये हमी भाव देण्यात यावा.
जिंतूर, सेलू तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये घरगुती व शेतीपंपाची महावितरणकडून सक्तीची वीजबिल वसुली करण्यात येत असून बिल न भरल्यास नागरिकांना व शेतकऱ्यांना पूर्व सूचना न देता वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. शेतकरी अगोदरच आस्मानी संकटात त्रस्त असल्यामुळे राज्यशासनाकडून सक्तीची वीजबिल वसुली थांबविणे आवश्यक आहे. तसे न होता वीजतोडणी सारख्या सुलतानी निर्णयामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना वीज तोडणी तात्काळ बंद करण्यासाठी आदेशित करावे. जिंतूर, सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी प्रसादराव बुधवंत,अजयभैय्या चौधरी, विश्वनाथ राठोड, बाळासाहेब घुगे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, गणेशराव इलग, बाळासाहेब भांबळे, विजय खिस्ते, शरदराव मस्के, मनोज थिटे, मनीषाताई केंद्रे, मनोहर डोईफोडे, शेख इस्माईल, चंद्रकांत बाहीरट, संजय(बंटी)निकाळजे, सोहेल सर, उस्मान पठाण, आहेमद बागबान, मधुकर भवाळे, खयुम कादरी, बी.जी.चव्हाण, मधुकर देशमुख वस्सा, गजानन चव्हाण, विजय वाकळे, विठ्ठल देशमुख भोगाव, शंकर गंजे, श्रीकृष्ण पाटील, सचिन बोबडे, मकसूद पठाण, शौकत लाला, अक्कू लाला, बालाजी नव्हाट, घुगे सर, बबलू कदम, साहेबराव चव्हाण, प्रवीण चव्हाण, सलीम काझी, शंकर जाधव, शंकर माने, गजानन कुटे अंगद देशमुख, बाळासाहेब देशमुख, दत्तराव नवले, दीपक वाकळे, आसाराम बुधवंत, पिंटू डोंबे, सुरेश हरकळ, शाहेद सिद्धिकी, योगेश मगर, संजय काळे करंजी, विठ्ठल देशमुख पुंगळा, दाभाडे सर, बाळासाहेब दाभाडे, राहुल कणकुटे, दिगांबर कुटे, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पन्नास खोके, एकदम ओके…
जिंतूर तहसील कार्यालयासमोर सकाळी अकरा वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. या वेळी ‘ पन्नास खोके, एकदम ओके ‘ अशी घोषणाबाजी करीत शिंदे- फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी तीव्र रोष व्यक्त केला. सेलू येथील आंदोलनातही माजी आमदार विजय भांबळे यांनी राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. सेलू-जिंतूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावावेत, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.
महाशिवरात्री उत्सव : चैतन्य देवींच्या देखाव्याला सेलूकरांचा मोठा प्रतिसाद, ब्रह्माकुमारींचा उपक्रम
सेलूतील जिजामाता बाल विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात
स्नेहसंमेलन : ‘नूतन’च्या चिमुकल्यांचा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम