हरभरा खाक : अज्ञाताकडून हरभऱ्याच्या गंजीला आग; सव्वा दोन लाख रूपयांचे शेतकऱ्याचे नुकसान…

हरभरा खाक : अज्ञाताकडून हरभऱ्याच्या गंजीला आग; सव्वा दोन लाख रूपयांचे शेतकऱ्याचे नुकसान…

मंठा तालुक्यातील अव्वलगाव येथील प्रकार, नुकसान भरपाईची मागणी

मंठा : तालुक्यातील अव्वलगाव येथे रात्रीच्या सुमारास हरभऱ्याच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अव्वलगाव ( ता.मंठा) शिवारातील गट क्रमांक 96,97,98 मधील भगवानराव झांजे यांची साडे चार एकर मधील हरभरा गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्यामुळे त्यांचे साडेचार एकरातील पंचेचाळीस ते पन्नास क्विंटल हरबरा जळून खाक झाला. त्याची बाजार भाव नुसार किंमत सव्वा दोन लाख रूपयांचे असून यामध्ये त्याचे मोठे नुकसान झाले आहे. रात्रीची वेळी शेतात कोणी नसल्याचे पाहून अज्ञात व्यक्तीने आग लावली आहे. या प्रकरणी मंठा पोलिसांनी माहिती दिली आहे. गुन्हा नोंदविण्याची पोलिसात प्रक्रिया चालू आहे

भगवानराव झांजे यांनी तळ हाताच्या फोडासारखे जपलेल्या पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी व आजुबाजुलच्या शेतकरी यांनी हळहळ व्यक्त केली आहे हवामान विभागाकडून काही दिवसात गारपीट येणार असल्याने घाई गडबडीत हरभरा पिक काढून त्याची गंजी घातली होती. आता काही दिवसातच मळणी यंत्राद्वारे हरबरा काढण्यास येणार होता. अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला.तरी भगवानराव झांजे यांना शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!