रानडे स्मृती व्याख्यानमाला : जातीय भेद, फुटीरतेचे देशापुढे मोठे संकट : दादा लाड

रानडे स्मृती व्याख्यानमाला : जातीय भेद, फुटीरतेचे देशापुढे मोठे संकट : दादा लाड यांचे मत

सेलू : स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला : विवेकानंद विद्यालय, देवगिरी बॅंकेचे आयोजन

sakashnews.com

सेलू जि.परभणी : देशासमोर आजही जातीय भेदाचे, फुटिरशक्तीचे देशापुढे मोठे संकट मोठे संकट आहे. जातीय फुटीरतेचा वापर करून स्वकियांविरध्द स्वकीय आणि जगातील शत्रुराष्ट्रे राजकीय माध्यमातून देशाची लोकशाही व सार्वभौमत्व धोक्यात आणत आहे‌.‌ त्यामुळे आगामी निवडणुक ही भारतीय विरुद्ध जग’ अशी होऊ शकते, असे मत भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटक दादा लाड यांनी शनिवारी (११ मार्च) केले.
सेलू (जि.परभणी) येथील नूतन विद्यालय सभागृहात भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई संचालित विवेकानंद प्राथमिक विद्यालय व देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आयोजित अकराव्या स्वर्गीय जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प दादा लाड यांनी शनिवारी गुंफले. ‘देशातील आंतर- बाह्य संकटे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे होते. व्यासपीठावर सेलू तालुका संघचालक डॉ.सचिन मंत्री, संयोजक हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लुरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
समाज संघटित होण्यासाठी हृदयाची परस्पर जवळीक हवी, असे सांगून सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आगामी निवडणुकीत भारतीय नागरिकांनी जागरूकपणे जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे असे दादा लाड म्हणाले. अध्यक्षीय समारोपात किशोर शितोळे यांनी जनुभाऊंच्या समर्पित कार्याचे स्मरण देत जनुभाऊंचा राष्ट्रभाव व सेवाभाव प्रत्येकाने जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले. प्रास्ताविक उपेंद्र बेल्लुकर, सूत्रसंचालन विजय चौधरी,‌ तर शंकर शितोळे यांनी आभार मानले. कल्याणी पाठक यांनी गायिलेल्या पसायदानाने सांगता झाली. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी विवेकानंद प्राथमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, देवगिरी बँकेतील कर्मचारी परिश्रम घेत आहे.

समाज संघटित होण्यासाठी हृदयाची परस्पर जवळीक हवी, असे सांगून सार्वभौमत्व टिकवण्यासाठी आगामी निवडणुकीत भारतीय नागरिकांनी जागरूकपणे जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे असे दादा लाड म्हणाले. अध्यक्षीय समारोपात किशोर शितोळे यांनी जनुभाऊंच्या समर्पित कार्याचे स्मरण देत जनुभाऊंचा राष्ट्रभाव व सेवाभाव प्रत्येकाने जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे नमूद केले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!