काळाचा घाला : दोन शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू; मानवत शहरातील महामार्गावरील घटना 

काळाचा घाला : दोन शिक्षकांचा भीषण अपघातात मृत्यू; मानवत शहरातील महामार्गावरील घटना 

दुर्दैवी घटना, सर्वत्र हळहळ, ट्रक चालक फरारी 

परभणी : सकाळी सकाळी शाळेकडे दुचाकीवरून निघालेल्या दोन शिक्षकांचा भरधाव ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. मानवत शहरातून जाणाऱ्या कल्याण ते निर्मल या राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (१४ मार्च) हा भीषण अपघात झाला.

या बाबत माहिती अशी की, मानवत येथील शकुंतला विद्यालयातील शिक्षक रामेश्वर कदम व गंगाधर राऊळ हे दुचाकीने (क्रमांक एमएच २२ ए एच ७०३१ ) शाळेकडे येत असताना, पाथरीहून परभणीकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने ( एम एच १३ आर ३६८४ दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघाही शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर ट्रकचालक जागेवरून फरारी झाले आहेत, अशी माहिती आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत सविस्तर वृत्त समजलेले नाही. दरम्यान, अपघाताची माहिती समजतात मानवत शहरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली आहे. अपघातामध्ये दोन शिक्षकांचा मृत्यू झाला असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. तर दोन्ही शिक्षकांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मानवत येथील रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, मागील काही दिवसापासून परभणी जिल्ह्यामध्ये अपघाताचे प्रमाण वाढले आहे. वाहनधारक आपल्या ताब्यातील गाड्या निष्काळजीपणाने चालवत असल्याने अनेक निष्पापांना आपला जीव गमवावा लागत आहे. यामुळे रस्ता सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!