प्रबोधन : प्रेरक इतिहासातून तरूण पिढी घडवावी : भास्करराव ब्रह्मनाथकर यांचे प्रतिपादन
सेलू : स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला
सेलू : भारताला बलशाली राष्ट्र बनविण्यासाठी राष्ट्रभावनेने भारावलेल्या समर्पित तरूण पिढी गरज आहे. ही पिढी प्रेरणादायी इतिहासातूनच घडवावी लागेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र इतिहास संकलन समितीचे सदस्य भास्करराव ब्रह्मनाथकर यांनी सेलू ( जि.परभणी) येथे केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचालित स्वामी विवेकानंद संस्कार केंद्र व देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वतीने आयोजित स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प ब्रह्मनाथकर यांनी रविवारी गुंफले. त्या वेळी ते बोलत होते. ‘हैद्राबाद मुक्ती संग्राम’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डाॅ.सुरेंद्र अलुरकर हे होते. या वेळी संयोजक हरिभाऊ चौधरी, उपेंद्र बेल्लूरकर यांची उपस्थिती होती.
ब्रह्मनाथकर म्हणाले, ” ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लीम भेदनितीचा अवलंब करीत मुस्लिमांना जवळ केल्याने हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा उदयास आला. या लढ्यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग, आर्य समाजाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. परभणी जिल्ह्याचा वाटा उल्लेखनीय आहे. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, दगडाबाई शेळके, गीताबाई व विनायकराव चारठाणकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्य महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.”
शनिवारी (११ मार्च) भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटक दादा लाड यांचे व्याख्यान झाले. ” देशातील आंतर- बाह्य संकटे’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष किशोर शितोळे होते. सेलू तालुका संघचालक डॉ.सचिन मंत्री, हरिभाऊ चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन अभिषेक राजूरकर, तर करूणा कुलकर्णी यांनी आभार मानले. व्याख्यानमालेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक शंकर शितोळे, शाखा व्यवस्थापक विश्वास देव, विजय चौधरी, कल्याणी पाठक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
” ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लीम भेदनितीचा अवलंब करीत मुस्लिमांना जवळ केल्याने हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा उदयास आला. या लढ्यामध्ये सरदार वल्लभ भाई पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, स्वातंत्र्य सैनिकांचा सहभाग, आर्य समाजाचे योगदान महत्वाचे ठरले आहे. परभणी जिल्ह्याचा वाटा उल्लेखनीय आहे. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, दगडाबाई शेळके, गीताबाई व विनायकराव चारठाणकर यांच्यासह अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या कार्य महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.”