विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मंजूर करा; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मुख्यमंत्र्यांना पाठिवले निवेदन
सेलू,जि.परभणी : बार्टी सेंटर बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करावी, पीएचडीधारकांना फेलोशिप आदींसह विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या मुख्यमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत बुधवारी (५ एप्रिल) निवेदन पाठविण्यात आले. या वेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस मिलिंद सावंत, शेषराव जल्हारे, भगवान जगताप, शेषराव नंद, विश्वनाथ डबडे, भीमराव गोटे, विकास धापसे, अविनाश मालसमींदर, दिलीप मालसमींदर आदींची उपस्थिती होती.अट्रॉसिटी अंतर्गत पीडितांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दयावा, अनुसूचित जातीच्या विकासासाठीच्या निधीतील कपात रद्द करून वाढवून देण्यात यावी आदी मागण्यांचाही निवेदनात समावेश आहे.
मागण्या अशा :
1) डॉ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती तात्काळ विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करावी.
2) मागील 43 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावरील आंदोलन करणाऱ्या पीएचडीच्या 861 विद्यार्थ्यांना तात्काळ फेलोशिप मंजूर करावी.
3) IBPS च्या 50000 विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या 30 बार्टी सेंटर्सला बंद करण्याचा तुघलकी निर्णय घेणाऱ्या सामाजिक न्याय विभागाच्या सचिव सुमंत भांगे यांची चौकशी करून त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात यावी.
4)अट्रॉसिटी अंतर्गत पीडितांना देण्यात येणाऱ्या अनुदानासाठी निधी उपलब्ध करून दयावा.
5) अर्थसंकल्पात अनुसूचित जातीच्या विकासासाठी देण्यात येणाऱ्या निधीत 12 टक्के कपात करण्यात आली आहे, ती पूर्ववत वाढवून देण्यात यावी…