मोदी @9 जनसंवाद अभियान : सेलूतील प्रबुद्ध नागरिक संमेलनाला मोठा प्रतिसाद
सेलू जि.परभणी , दि.१३ : जागतिक स्तरावर भारताला बलशाली व प्रगत राष्ट्र म्हणून सिद्ध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेच सक्षम व समर्थ नेतृत्व आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी मोदींजींचे हात बळकट करावे, असे आवाहन माजी मंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी केले.
येथील साई नाट्य मंदिरात मंगळवारी, १३ जून रोजी आयोजित मोदी जनसंवाद अभियानांतर्गत प्रबुद्ध नागरीक संमेलनात प्रमुख वक्ते म्हणून खासदार बोंडे बोलत होते. अध्यक्षस्थानी द्वारकादास मंत्री, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय केळकर, आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर, कॅप्टन जे.पी.शर्मा, प्रदेश सचिव रंगनाथ सोळंके, डॉ.उमेश देशमुख, डॉ.संजय लोंढे, डॉ.संजय रोडगे, डॉ.जनार्धन गोळेगावकर, डॉ. ए.एम.डख, शशिकांत देशपांडे, डॉ. थोरे, श्रीवल्लभ लोया, डी.व्ही.मुळे, ॲड. उमेश खारकर, अशोक खताळ डॉ.ऋतुराज साडेगावकर आदींची उपस्थिती होती.
या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी मोदी सरकारने गेल्या ९ वर्षात केलेल्या विकास कार्याचा आलेख मांडला. सामान्य जनता ,शेतकरी, कष्टकरी कामगार, महीला, बेरोजगार युवक, दलित, आदीवासी, अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. प्रास्ताविक आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, तर अमोल निकम यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिनकर वाघ, दगडोबा जोगदंड, जयसिंग शेळके,ज्ञकपील फुलारी, अर्जुन बोरूळ, ॲड.दत्तात्रय कदम, गणेश नाईकवाडे, शिवहारी शेवाळे,भागवत दळवे, किशोर कारके, रामेश्वर काजळे, विठ्ठल कोक्कर, गणेश सवने,अशोक शेलार, गोविंद मगर, लक्ष्मण बोराडे, ॲड.रामेश्वर शेवाळे आदींनी परीश्रम घेतले.