इंधनाअभावी अनेक बसफेर्या जिंतूरमध्ये रद्द
ऐनवेळी धावपळ, प्रवाशांंचे अतोनात हाल,
परभणी : डिझेल नसल्याचे कारण सांगत जिंतूर आगारातून निघणार्या अनेक बस फेर्या मंगळवारी (१३ जून) सकाळपासूनच रद्द झाल्याने प्रवाशांंचे अतोनात हाल झाले.
मंगळवारी मोठी लग्न तिथी असल्याने प्रवाशांची मोठी गर्दी होती. परंतु आगार प्रशासनाने चक्क लेखी सूचना लावून काही बस उशिराने धावतील, तर बर्याचशा बस फेर्या रद्द करण्यात आल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. गेल्या दोनज्ञमहिन्यांपासून कमी अधिक प्रमाणात हीच परिस्थिती निर्माण होत आहे. प्रवाशी बसस्थानकावरून आले, की डिझेल नाही म्हणून फेरी रद्द आहे, असे सांगितले जाते. डिझेल नसल्याने फेर्या रद्द करण्यात आले असल्याचे फलकही चौकशी कार्यालयाच्या बाहेर लावले जातात. याशिवाय आगारातून निघालेली बस नियोजित फेरी पूर्ण करेल याचीदेखील खात्री राहिलेली नाही. दररोज अनेक बसेस नादुरुस्त होऊन रस्त्यावरच पडतात. याचेही अनुभव प्रवाशांना रोजच येत आहेत.
मोदी @9 जनसंवाद अभियान; सेलूतील प्रबुद्ध नागरिक संमेलनाला मोठा प्रतिसाद