विविध परीक्षेतील गुणवंतांचा गौरव; जिंतूर येथील श्री नृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम
सेलू,जिंतूर तालुक्यातील गुणवंतांचा सन्मान : माजी आमदार विजय भांबळे यांच्यासह मान्यवरांनी केले मार्गदर्शन, विद्यार्थी, पालक, नागरिकांची मोठी उपस्थिती
जिंतूर/परभणी : जिंतूर (जि.परभणी) येथील श्री नृसिंह प्रतिष्ठानच्या वतीने विविध परीक्षेतील गुणवंतांचा तसेच विविध पदावर निवड झालेल्या यशवंतांचा शनिवारी, २४ जून रोजी गुणगौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी सेलू-जिंतूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विजय भांबळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक तथा प्रसिद्ध लेखक शरद तांदळे, परभणी येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीचे संचालक विठ्ठल कांगणे, प्रतिष्ठानच्या अध्यक्ष प्रेक्षा भांबळे-बोराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, अशोकनाना काकडे, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, प्रकाशराव मुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिंतूर तालुकाध्यक्ष मनोज थिटे, सेलू तालुकाध्यक्ष सेलू माऊली ताठे, माजी पंचायत समिती सभापती गणेशराव ईलग आदी मान्यवरांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी विठ्ठल कांगणे यांनी मार्गदर्शन करताना, आई वडिलांच्या कष्टाचे सोने करण्याचा मोलाचा संदेश दिला. मुलांनी सोशल मिडिया पासून दूर राहून संपूर्ण लक्ष शिक्षणावर केंद्रित केले पाहिजे. आयुष्याच्या वाटेवर करिअर करण्यासाठी शिक्षण अत्यंत मोलाचे आहे, असे कांगणे म्हणाले.
शरद तांदळे यांनी, आजची पिढी फेसबुक, युटूब, इंस्टाग्रामच्या आहारी गेली असून, अनेक विद्यार्थी मनोरुग्ण होत आहेत, असे नमूद करून अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यामधून राष्ट्रीय उद्योजक घडले पाहिजेत. त्यासाठी पुस्तक वाचनाची आवड जोपासत थोर समाजसुधारक यांचे चरित्र वाचणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला दिला.
माजी आमदार विजय भांबळे यांनी अध्यक्षीय भाषणात, आपल्या मायभूमीतून वर्ग एकचे अधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री नृसिंह प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर राहील, असे नमूद करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग, नीट, एमएमबीबीएस, महाराष्ट्र पोलीस या विविध पदावर निवड झालेल्या तसेच; इयत्ता दहावी, बारावीसह जिंतूर-सेलू तालुक्यातील शाळांमधील प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन माजी आमदार विजयराव भांबळे व मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
प्रास्ताविक प्रेक्षाताई भांबळे-बोराडे यांनी केले. दहावी व बारावीनंतर विध्यार्थ्याचा करिअर निवडण्याचा हाच काळ असतो. यावेळी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे अत्यंत गरजेचे असते, यासाठी गुणगौरव समारंभ प्रेरक ठरतात, असे प्रेक्षा भांबळे-बोराडे यावेळी म्हणाल्या.
याप्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, अशोकनाना काकडे, बाळासाहेब घुगे, विठ्ठल घोगरे, मुरलीधर मते, अभिनय राऊत, प्रकाशराव मुळे, जिंतूर तालुकाध्यक्ष मनोज थिटे, सेलू तालुकाध्यक्ष सेलू माऊली ताठे, माजी पंचायत समिती सभापती गणेशराव ईलग, मधुकर भवाळे, माजी सदस्य विजयराव खिस्ते, शहरअध्यक्ष शौकत लाला, नगरसेवक दल्मीर पठाण, इस्माईल शेख, अहेमद बागबान, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, सचिन बोबडे, पिणु काळे, बालाजी नव्हाट, अक्कू लाला, खयुम कादरी, पंडित जाधव, शंकर जाधव, विजय वाकळे, गजानन कांगणे, शंकर गंजे,सचिन दुधगावकर, सुनील सावंत, अंगद देशमुख, सुधाकर रोकडे, विशाल देशमुख, हकीम लाला, रघुनाथ बागल, गोरख भालेराव, केशव सोळंके, आशाताई उबाळे, आशाताई खिल्लारे, याबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, सरपंच व विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर मते यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मायभूमीतून वर्ग एकचे अधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री नृसिंह प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर राहील, असे माजी आमदार विजय भांबळे यांनी यावेळी नमूद केले.विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आजची पिढी फेसबुक, युटूब, इंस्टाग्रामच्या आहारी गेली असून, अनेक विद्यार्थी मनोरुग्ण होत आहेत, असे नमूद करून अपयश येणाऱ्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता उद्योग व्यवसायाकडे वळले पाहिजे. गुणवंत विद्यार्थ्यामधून राष्ट्रीय उद्योजक घडले पाहिजेत. त्यासाठी पुस्तक वाचनाची आवड जोपासत थोर समाजसुधारकांचे चरित्र वाचणे अत्यंत गरजेचे आहे, असा सल्ला उद्योजक व लेखर शरद तांदळे यांनी दिला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जास १४ जुलैपर्यंत मुदतवाढ