मनमानी ठेकेदार; अधिकारी बेजबाबदार : सेलूजवळील राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘रामभरोसे’

मनमानी ठेकेदार; अधिकारी बेजबाबदार : सेलूजवळील राष्ट्रीय महामार्गाचे काम ‘रामभरोसे’

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन, डिग्रसपाटी ते सेलू रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी

सेलू : ५४८ ब या राष्ट्रीय महामार्गावर सेलूजवळील डिग्रसपाटी ते सेलू काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. मुरुमाऐवजी काळ्या मातीचा सर्रासपणे वापर होत आहे. अत्यंत बेपर्वाईने संबंधित ठेकेदाराने कामात मस्ती चालविली आहे.
या रस्ते कामांबाबत सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५४८-बी देवगाव फाटा ते पाथरी रस्ता काम तातडीने पूर्ण करण्याबाबत केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दबाव गटाच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले आहे. या मार्गावरील दिग्रसपाटी ते सेलू काम चालू आहे..सदर काम हे अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. संपूर्ण रस्ता उखडुन ठेवला आहे. ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करीत आहे. यापूर्वी सदर ठेकेदार याने सर्रास मुरुम ऐवजी काळीमाती वापरण्याचा सपाटा लावला होता. परंतु, जागरूक नागरिकांनी वेळीच सदर बाब प्रशासनाचे निदर्शनास आणून दिली नंतर थोडी सुधारणा झाली. परंतु या कामावर राष्ट्रीय महामार्ग कार्यालय जालना येथील अधिकारी यांचे कसल्याही प्रकारचे नियंत्रण नाही. काम चालू असताना कधीच अधिकारी कामाचे दर्जाबाबत पाहणी करण्यासाठी हजर नाहीत. त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे.
हा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून तालुक्यातील वीस गावांना ये-जा करण्याचा मार्ग आहे.पावसाळ्यात शेतकऱ्यांना खते, बि-बियाणे वाहतुकीची अन्य सोय या रस्त्याच्या शिवाय नाही. तसेच; खेड्यातील शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना व अडीअडचणी मध्ये आजारी नागरिकांना दवाखान्यात येण्यास हाच मार्ग आहे
नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक दुचाकी वाहने घसरून पडल्याने नाहक अनेक नागरिकांना अपंगत्व आले. हा रस्ता आता मृत्यूचा सापळा झाला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत आहे. अधिकारी यांचेशी संपर्क केला असता, त्यांचेकडून अत्यंत बेजबाबदार उत्तर नागरिकांना मिळते.

या सर्व प्रकारामुळे जनता हैराण झाली आहे. आता थेट केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणी लक्ष घालावे, काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित विभगास द्यावेत. अशी मागणी सेलू तालुका दबाव गटाच्या वतीने करण्यात आली आहे. निमंत्रक ॲड.श्रीकांत वाईकर, ओमप्रकाश चव्हाळ, इसाक पटेल, सतिश काकडे, दिलीप मगर, मुकूंद टेकाळे, दता कांगणे, रामचंद्र कांबळे, लक्ष्मण प्रधान, रौफभाई, लिंबाजी कलाल, नारायण पवार, गुलाब पौळ, विलास रोडगे, विलास केवारे, उमेश काष्टे, योगेश सुर्यवंशी, उत्तम गवारे,अजित मंडलीक,दिलीप शेवाळे, उध्दव सोळंके, आबासाहेब भाबट आदींच्या निवेदनावर सह्या आहेत. यापुर्वीही मंत्री गडकरी यांना हे काम तातडीने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे बाबत निवेदन देण्यात आले मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्यावेळी केंद्रित मंत्रालयाने दिलेल्या सुचनेकडे दुर्लक्ष केले, असे दबाव गटाचे म्हणणे आहे.

नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसाने या रस्त्यावर चिखल झाल्याने अनेक दुचाकी वाहने घसरून पडल्याने नाहक अनेक नागरिकांना अपंगत्व आले. हा रस्ता आता मृत्यूचा सापळा झाला आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा यासाठी कारणीभूत आहे. अधिकारी यांचेशी संपर्क केला असता, त्यांचेकडून अत्यंत बेजबाबदार उत्तर नागरिकांना मिळते


आज गुणगौरव सोहळा : सेलू,जिंतूर तालुक्यातील विद्यार्थ्यांचा सत्कार; श्री नृसिंह प्रतिष्ठानचा उपक्रम

फोटो व्हायरलची धमकी देत मुलीवर अत्याचार; दोघाविरूद्ध सेलूत गु्न्हा

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!