वाचनातून मिळते जीवनाला नवी दिशा : शिक्षण तज्ज्ञ प्राची साठे यांचे मत; अक्षर आनंद वाचन चळवळीचे केले कौतुक
सेलू/परभणी : जीवन सकारात्मक होण्यासाठी, नैराश्य कमी करण्यासाठी, जीवनाला एक नवी योग्य दिशा देण्यासाठी वाचन महत्त्वपूर्ण आहे. दिवसांमध्ये आपण काहीतरी वाचन केलं पाहिजे, असे मत शासनच्या शैक्षणिक सल्लागार, अभ्यासक्रम निर्मितीच्या समन्वयक, तथा शिक्षण तज्ज्ञ डॉ.प्राची साठे यांनी व्यक्त केले.
मानवत तालुक्यातील सोमठाणा येथील जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक विनोद शेंडगे यांनी सुरू केलेल्या अक्षर आनंद वाचन चळवळीची दखल प्राची साठे घेतली. या चळवळीविषयी जाणून घेतले. कार्य व स्वरूपाचे कौतुक केले.शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे, गटशिक्षणाधिकारी डी.आर.रणमाळे , केंद्रप्रमुख शिरीष लोहट यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती.
अक्षर आनंद वाचन चळवळीची दखल एका राज्यस्तरावरील संवेदनशील कार्य करणाऱ्या शिक्षण तज्ज्ञाने घेतली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या शैक्षणिक उपक्रमात प्राची साठे यांनी मोलाचे कार्य केले आहे. स्व-जाणिवा याविषयीचे त्यांचे विचार मंथन श्रवणीय व मनाला प्रेरित करणारं आहे. महाराष्ट्रभर सातत्याने शिक्षकांशी याविषयी त्या संवाद साधत आहेत. मन परिवर्तनाच कार्य त्या करत आहेत. सहकुटुंब वाचन ,पुस्तक वाचन स्पर्धा, वाढदिवस वाचन, वाचन संस्कार केंद्र अशा कृतिशीलतेतून ही चळवळ समाजाभिमुख होत आहे. बालवाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही बाब उल्लेखनीय आहे .अक्षर आनंद वाचन चळवळी चा हा सन्मान आपण सर्वजण करत असलेल्या कार्याला अधोरेखित करत आहे. आपली सामाजिक प्रगल्भता, समाजाप्रती असलेली आपली जाणीव या कार्यातून वारंवार दिसत आहे.
सक्षम भारत, बलशाली युवा घडवण्यासाठीच हे आपलं कार्य अतुलनीय आहे.अशा या सामाजिक ,राष्ट्रीय, शैक्षणिक, ऐतिहासिक चळवळीचे आपण सर्वजण घटक आहोत. समाजाला दिशा देणाऱ्या मोहिमेचे आपण सुकाणू आहात. आपण दिशादर्शक, समन्वयक ,मार्गदर्शक आहात. निकोप समाज जडण घडणीत आपलं योगदान विशेष आहे. या विषयी या वेळी सुसंवाद घडवून आणण्यात आला.
कामगारांसाठी दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात; माजी आमदार लहाने यांनी केले उद्घाटन