हैदराबाद मुक्तीसंग्राम : अंबाजोगाईतील स्मारक प्रेरणादायी ठरेल; सेलूतील कार्यक्रमात डॉ.सुरेश खुरसाळे यांचे प्रतिपादन

हैदराबाद मुक्तीसंग्राम : अंबाजोगाईतील स्मारक प्रेरणादायी ठरेल; सेलूतील कार्यक्रमात डॉ.सुरेश खुरसाळे यांचे प्रतिपादन

श्री योगेश्वरी शिक्षण संस्था पदाधिकाऱ्यांचा अभ्यास दौरा, नूतन संस्था पदाधिकारी व मान्यवरांशी साधला संवाद

सेलू जि.परभणी : हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अंबाजोगाई (जि.बीड) येथील श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेने स्वामी रामानंद तीर्थ आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्याचे स्मारक उभारण्याचा संकल्प केला आहे. मुक्तीसंग्रामाचा जाज्वल्य इतिहास पुढच्या पिढीला कळावा, या दृष्टीने हे स्मारक निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेश खुरसाळे यांनी रविवारी, २५ जून रोजी सेलू (जि.परभणी) येथे व्यक्त केला.
स्मारकाबाबत सूचना, संकल्पना जाणून घेण्यासाठी संस्थेच्या वतीने अभ्यासदौरा आयोजित करण्यात आलेला आहे. मुक्तीसंग्रामाचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सेलू शहरातील नूतन विद्यालय शिक्षण संस्था, नूतन विद्यालय, हुतात्मा स्मारक, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयाला पदाधिकाऱ्यांनी रविवारी भेट दिली. विविध क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधला. नूतन महाविद्यालयाच्या पं.या.तरफदार सभागृहात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. या वेळी श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेचे चिटणीस गणपत व्यास, कोषाध्यक्ष माणिकराव लोमटे, नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के‌.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी, माजी चिटणीस प्राचार्य डॉ.द.रा.कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.सुरेश खुरसाळे म्हणाले, ” हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा हा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर सर्वांना समान संधी देणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठीचा होता. शिक्षणातूनच सुजाण नागरिक घडतात. समाज जागृती होते, असे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मत होते. म्हणूनच आज शाळा, महाविद्यालयांची संख्या वाढलेली आहे. त्याची गंगोत्री ही स्वामी रामानंद तीर्थ आहेत.”
या वेळी गणपत व्यास यांनी स्मारकाबाबत माहिती दिली. स्मारक संस्मरणीय व्हावे, यासाठी प्राचार्य द.रा.कुलकर्णी, डॉ.शैलजा बरूरे, प्रा.गणेश पिंगळे, प्रा.सुभाष बिराजदार, रविकिरण गंभीरे, किशोर कटारे यांनीही मौलिक सूचना, संकल्पना या वेळी मांडल्या. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.महेश कुलकर्णी यांनी, तर प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी आभार मानले. शोभा खुरसाळे, प्राध्यापक रमेश सोनवळकर, संस्था कार्यकारिणी सदस्य, स्वातंत्र्य सैनिकांचे नातेवाईक, शिक्षक, विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

डॉ.सुरेश खुरसाळे म्हणाले, ” हैदराबाद मुक्तीसंग्रामाचा लढा हा केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हता, तर सर्वांना समान संधी देणारी शासन व्यवस्था निर्माण व्हावी, यासाठीचा होता. शिक्षणातूनच सुजाण नागरिक घडतात. समाज जागृती होते, असे स्वामी रामानंद तीर्थ यांचे मत होते. म्हणूनच आज शाळा, महाविद्यालयांची संख्या वाढलेली आहे. त्याची गंगोत्री ही स्वामी रामानंद तीर्थ आहेत.”

हैदराबाद मुक्तीसंग्राम : अंबाजोगाईतील स्मारक प्रेरणादायी ठरेल; सेलूतील कार्यक्रमात डॉ.सुरेश खुरसाळे यांचे प्रतिपादन


रास्तारोको : सेलूकरांचे आज आंदोलन; सेलू-डिग्रस रस्तेकामाचा दर्जा सुमार असल्याचा आरोप

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!