चिंतेचे ढग : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; महिनाभरात ३८ टक्केच बरसला

चिंतेचे ढग : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; महिनाभरात ३८ टक्केच बरसला

चिंतेचे ढग : शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; महिनाभरात ३८ टक्केच बरसला

परभणीतील ५२ पैकी ४० मंडळामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

परभणी : जून महिना सरला, तरी परभणी जिल्ह्यात सरासराच्या केवळ ३८.३ टक्के पाऊस बरसला आहे. केवळ गंगाखेड तालुक्यातील पाच पैकी तीन मंडळात शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्ह्यातील ५२ पैकी ४० मंडळांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जुजबी पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असल्या, तरी अद्यापही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. धूळपेर केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी सहा दिवसच पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची जून महिन्याची सरासरी १४५.३ मिलीमीटर आहे. मात्र, शुक्रवारी (३० जून) सकाळपर्यंत केवळ ५५.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गतवर्षी १३७ मिलीमीटर (९४.३ टक्के) झाला होता. यावर्षी ५२ पैकी २५ मंडळात ५० मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परभणीतील ९ पैकी फक्त जांब मंडळात ७९.५ मिलीमीटर, पाथरीतील चार पैकी कासापुरीत ७१ व पाथरीमध्ये ८१ मिलीमीटर, पालम तालुक्यातील पाच पैकी फक्त चाटोरी ( ८७ मिलीमीटर ) मंडळामध्ये समाधानकारक पाऊस झाला आहे. जिंतूरमध्ये आठही मंडळात सरासरी ३२.९ मिलीमीटर, तर सेलू तालुक्यातील सहापैकी चिकलठाणा ७६.८, तर वालूरमध्ये ७५.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सोनपेठमध्ये चार पैकी वडगाव (९८.२ मिलीमीटर) वगळता अन्य तीन मंडळात अल्प पाऊस झाला. मानवत तालुक्यातील पाच पैकी केकरजवळा ७४.५ व ताडबोरगाव मंडळात ५१.५ मिलीमीटर पाऊस झाला. जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील पाच पैकी तीन मंडळात शंभर मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला. यामध्ये गंगाखेड १३०.७, म्हातपुरी १०२.७, तर माकणी ११७.२ मिलीमीटर समावेश आहे. येत्या आठवड्यात मोठ्या पावसाची आस शेतकऱ्यांना आहे. नसता दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

जून महिना अखेरचा पाऊस मिलीमीटरमध्ये ( कंसात सरासरी पाऊस)

परभणी : ५२.३ (१५६.४), गंगाखेड : ८६.४ (१२०.८), पाथरी : ६७.५ ( १३३.९), जिंतूर : ३२.९ (१४५.५), पूर्णा : ५२.८ (१०१.१), पालम : ५०.८ (१४८.५), सेलू : ६१.६ (१५२.७), सोनपेठ : ६४.५ (१३३.८), मानवत : ५०.४ (१२९.५)

गेल्या दोन तीन दिवसात वालूर परिसरात चांगला पाऊस झाला. त्यामुळे कापूस, हळद लागवड, सोयाबीनची पेरणी सुरु झाली आहे. परंतु, मे महिन्यात महागडी बी- बियाणे खरेदी करून धूळपेर व कापसाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.यमुना संजय मुंढे, शेतकरी, वालूर ता.सेलू जि.परभणी

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!