सेलूतील ‘नूतन’ च्या गुणवंतांचा सत्कार; संस्था वर्धापनदिन, श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम
सेलू जि.परभणी : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या स्थापनेचा ८४ वा वर्धापनदिन व दलितमित्र श्रीरामजी भांगडिया स्मृतिदिन सोमवारी, ३ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विविध परीक्षेतील गुणवंत, पदकप्राप्त खेळाडू तसेच विविध सन्मानप्राप्त कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी डॉ.ऋषीकेश दीक्षित (जालना) उपस्थित होते. या वेळी उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, डॉ.शरद कुलकर्णी, प्राचार्य डॉ.महेंद्र शिंदे, मुख्याध्यापक नारायण सोळंके, संगीता खराबे, सुखानंद बेंडसुरे, प्राचार्य एन.पी.पाटील, एस.व्ही.पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.दीक्षित म्हणाले, ” संयम, परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन घेऊन उज्ज्वल भविष्य घडत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. पालकांनीही मुलांच्या समस्या, आहारविहार, व्यायाम, व्यक्तिमत्त्वातील बदल यासाठी जाणीवपूर्वक वेळ आणि लक्ष देण्याची गरज आहे. ” डॉ.एस.एम.लोया यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ व श्रीरामजी भांगडिया यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.व्ही.के.कोठेकर यांनी केले. संस्थेचा अहवाल डॉ.शरद कुलकर्णी यांनी मांडला. पूजा महाजन व विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन अशोक लिंबेकर यांनी केले. संगीता खराबे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला संस्था पदाधिकारी, सदस्य, विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
डॉ.ऋषीकेश दीक्षित म्हणाले, ” संयम, परिश्रम, सकारात्मक दृष्टिकोन, योग्य मार्गदर्शन घेऊन उज्ज्वल भविष्य घडत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी जीवन कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक आहे. पालकांनीही मुलांच्या समस्या, आहारविहार, व्यायाम, व्यक्तिमत्त्वातील बदल यासाठी जाणीवपूर्वक वेळ आणि लक्ष देण्याची गरज आहे. “