सर्वसामान्य जनतेची कामे तात्काळ मार्गी लावा : माजी आमदार विजय भांबळे यांनी घेतली तहसीलदारांच्या दालनात बैठक

जिंतूर : सर्वसामान्य नागरिकांची कामे तात्काळ मार्गी लागावीत, यासाठी माजी आमदार विजयराव भांबळे यांनी तहसीलदार सरोदे यांच्या दालनात विविध विषयावर बैठक घेतली व सर्व प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लावावेत अशा सूचना दिल्या.
जिंतूर तालुक्यातील सर्व समान्य नागरिकांची कामे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असून त्यात विद्यार्थी यांचे उत्पन्न प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर व विविध प्रमाणपत्रे तात्काळ निर्गमित करणे, अनेक शेतरस्ते, शिवरस्ते व पांदण रस्ते लोकांनी अतिक्रमण करून बंद केल्याने अनेक शेतकऱ्यांना शेतात जाण्यास त्रास होत आहे. राष्ट्रीय अर्थसाह्य योजना, नैसर्गिक आपत्ती मधील अनुदान तसेच श्रावण बाळ व विविध अनुदान योजनेचे प्रश्न तसेच अपंग व्यक्तींना अंत्योदय योजनेचे राशन कार्ड, इतर राशन कार्ड अनेक दिवसापासून तहसील कार्यालयात प्रलंबित आहेत. या सर्व समस्यांबाबत भांबळे यांनी तहसीलदार सरोदे यांच्याशी त्यांच्या दालनात बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा करून नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आहेत.
बैठकीस प्रसादराव बुधवंत, रामराव उबाळे, मनोज थिटे, गणेशराव इलग, मधुकर भवाळे, संजय निकाळजे, चंद्रकांत बहिरट, विजय वाकळे, दत्तराव नवले, परमेश्वर ढोणे, खुशाल चीभडे, शिवजी ढवळे, श्याम सारंग, पंडित जाधव, गंगाधरआप्पा तरटे, गजानन कुटे, शंकर माणे, जलील इनामदार, बबलू कदम, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
शॉर्टसर्किटमुळे आग लागून घराचे मोठे नुकसान;सेलूतील खतीब मोहल्ला भागातील घटना