Yellow Alert : परभणी जिल्ह्यात हवामान खात्याचा ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
नागरिकांनी सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे निर्देश
परभणी : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार गुरुवारी, २० जुलै रोजी मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सचिव स्वाती दाभाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
काय खबरदारी घ्यावी…
नैसर्गिक आपत्तीसंदर्भात खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असल्यास आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षितस्थळी ठेवण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.
आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाखाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे टाकू नका. घरात असल्यास उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. कारण हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक असल्याचे प्राधिकरणाच्या सचिव श्रीमतीदा भाडे यांनी कळविले आहे.
खबरदारीची उपाययोजना म्हणून नागरिकांनी विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. घरात असल्यास आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर ती त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असल्यास तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. तसेच नागरिकांनी आपले शेतमाल व पशुधन वेळेतच सुरक्षितस्थळी ठेवण्याच्या सूचनाही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केल्या आहेत.