जिंतूरचे अतिवृष्टी अनुदान गेले कुठे ? :  शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्याची माजी आमदार भांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिंतूरचे अतिवृष्टी अनुदान गेले कुठे ? :  शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्याची माजी आमदार भांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

जिंतूरचे अतिवृष्टी अनुदान गेले कुठे ? :  शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्याची माजी आमदार भांबळे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

परभणी : मागील वर्षीच्या (सन २०२२) अतिवृष्टी व सततच्या पावसाच्या नुकसानभरपाईचे १५ कोटी ६ लाख रुपये जिंतूर तालुक्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले होते. मात्र, वाटपाची कागदोपत्री कार्यवाही तलाठ्यांकडून सुरू असताना, अनुदान परत गेल्याच्या चर्चेने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे मागील वर्षीचे परत गेलेले अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ वाटप करण्यात यावे, अशी मागणी जिंतूरचे माजी आमदार विजय भांबळे यांनी सोमवारी, ३१ जुलै रोजी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात जिंतूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. जिंतूर तालुक्यात मागील वर्षी २०२२ मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे सरसकट शंभर टक्के नुकसान झालेले आहे. पुराचे पाणी शेतात जाऊन उगवलेली पिके वाहून गेली होती. शेतातील गाळ वाहून गेल्यामुळे खड्डे झाले होते. विहिरी पडल्या. वीजपंप व इतर साहित्य गाळात दबून प्रंचड नुकसान झाले होते. अनेक जनावरे दगावली. अनेक नागरिकांची घरे पडली होती. खरीपातील सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, हळद, ऊस व फळबाग आदी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बांधावर जाऊन पिकपंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारने अनुदान मंजूर केले आहे. परंतु, सदर अनुदान वाटप सरकारच्या कार्यालयीन फेऱ्यात अडकल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. या प्रकरणी प्रत्यक्ष लक्ष घालून, सरसकट प्रति हेक्टरी १३,८०० रुपये प्रमाणे नुकसान भरपाईचे अनुदान येत्या पंधरा दिवसामध्ये वाटप करण्यात यावे. अन्यथा; तीव्र आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला. या वेळी माजी आमदार विजय भांबळे, प्रसाद बुधवंत, अजय चौधरी, रामराव उबाळे, विश्वनाथ राठोड, मुरलीधर मते, अभिनय राऊत, विठ्ठल घोगरे, गणेशराव इलग, मनोज राऊत, खयुम कादरी, शंकर जाधव, पंडित जाधव, किशन मानवते, शंकर माने आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मागील वर्षीचे अनुदान वाटप सरकारच्या कार्यालयीन फेऱ्यात अडकल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष लक्ष घालून, सरसकट प्रति हेक्टरी १३,८०० रुपये प्रमाणे नुकसान भरपाईचे अनुदान येत्या पंधरा दिवसामध्ये वाटप करण्यात यावे. अन्यथा; तीव्र आंदोलनाचा इशारा जिंतूर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवेदनात देण्यात आला आहे.


समानतेच्या संधीतूनच मुलींच्या उत्कर्षाला मिळेल बळ : न्यायदंडाधिकारी मंदार राऊत यांचे मत; सेलूत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!